शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

अतुल सावे कोणा कोणाच्या घरी पाणी भरत आहेत ?

By सुधीर महाजन | Updated: April 30, 2019 15:46 IST

पाणी टंचाईला शिवसेनेइतकेच भाजप ही जबाबदार आहे याचा विसर मात्र भाजपला सोयीस्कर पडतो.

- सुधीर महाजन

सटाण्याला देव मामलेदारांचे मंदीर आहे; मामलेदार नावाचा देव म्हटल्यानंतर नावातच उत्सुकता खुण्या मारुती, कानफोडे हनुमान अशा नावांना सरावलेले आपले काम असतांनाही हे नाव कानावर पडले की वेगळेच वाटते. मामलेदार म्हणजे तहसीलदार. तहसीलदाराला लोक देव मानतात हे म्हणजे फारच झाले. तर या देव मामलेदारांनी बागलान परिसरात प्रचंड लोकोपयोगी काम केली. पाण्याचा प्रश्न सोडविला त्यांच्या अशा कामांनी जनतेने त्यांना देवत्त्व बहाल केले. त्यांचे मंदीर बांधले. त्याची दरवर्षी मोठी यात्रा भरते. सोयगाव या तालुक्याच्या गावानेही नाईक गुरूजींचे मंदीर बांधले. या शिक्षकाने आयुष्यभर ज्ञानदान आणि समाज कार्य केले. पाच वर्षापूर्वी निधनानंतर त्यांचे मंदीर गावाने बांधले. अशी उदाहरणे दुर्मीळ असतात आपले काम चाकोरीबाहेर जावून करणे व लोककल्याण साधने अशांनाच देवत्त्व प्राप्त होते. आज एक बातमी वाचतांना या दोघांची आवठवण झाली. देव मामलेदारांना मी पाहिलेले नाही. कारण ते ब्रिटिशांच्या काळात होते; परंतु नाईक गुरूजींना भेटलो आहे. आपण वेगळे काही करतो आहे असा अभिनिवेश नसलेला निर्मळ, साधा माणुस तुमच्या माझ्या घरातील आजोंबासारखा. 

तर या दोघांच्या आठवणीचे कारण एक बातमी होती. औरंगाबादमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. आठ-दहा दिवस पाणी मिळत नाही. सगळ्यांच्याच तोडचे पाणी पळाले आहे. जनतेच्या रोषामुळे लोकप्रतिनिधी तोंड लपवत आहेत. त्यांच्या नाकर्तेपणाची प्रतिती लोकांना पावला पावलावर येते तर पाण्याच्या टँकरसाठी सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर एक जमाव गेलेला. आधिच उन्हाची काहिली आणि त्यात पाणी टंचाईची भर संतापलेल्या जमावाने येथे टँकर अडवले. तेवढ्यात एक टँकर रांग मोडून घुसला तो भाजपचे आमदार अतुल सावेंचा होता जनतेला पाणी पुरवठा करण्याच्या कल्याणकारी कामासाठी सावेंनी हा टँकर सुरू केला. मतदारांच्या काळजीचा उदात्त हेतु असावा असे तरी दिसत होते. लोकांनी तो अडवला. एकाने त्यातील रजिस्टर उघडून नावे तपासली तर म्हणजे या टँकरने पाणी देवून कोणाची सेवा बजावली हे तपासले आणि नावे वाचण्यास सुरूवात केली. तर यात विजया रहाटकर ज्या की माजी महापौर आणि आता महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. किशनचंद तनवाणी, स्वत: अतुल सावे अशी नावे बाहेर आली. आणखी वस्त्रहरण नको म्हणून समयसूचकता दाखवत सावे यांच्या टँकर चालकाने ते रजिस्टर हिसकावून घेत पोबारा केला. या कृतीतूनच आमदारांच्या समाजसेवेचे दर्शन घडले.

पाण्याच्या प्रश्नावर गेल्या महिन्यात भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलनाचा आव आणला होता. जो तो उठून आंदोलन करत आपण कसे समजासेवक, जनतेचे कैवारी आहोत याचे दर्शन घडवत होता. खरे तर शिवसेनेच्या गळ्यात गळा घालून ही मंडळी संत्तेत आहेत, सत्ताधारी आहेत; पण सत्ताधारीच आंदोलन करतात असे अभूतपूर्व दृश्य औरंगाबादकरांनी अनुभवले. पाणी टंचाईला शिवसेनेइतकेच भाजप ही जबाबदार आहे याचा विसर मात्र भाजपला सोयीस्कर पडतो. भ्रष्टाचारी माणूस भरपूर पैसे कमावतो व पाप क्षालनासाठी वर्षातून एकदा तिरुपतीला जावून हुंडीत काही रक्कम टाकून स्वत:चे समाधान करून घेतात, असा हा नगरसेवकांच्या आंदोलनाचा प्रकार आहे. त्यामुळे आपल्या पक्षांच्या सहकाऱ्यांच्या घरी अतुल सावे पाणी भरतात यात वावगे ते काय ही सर्व एकाच संस्कृतीची मंडळी आहेत हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. रोम जळत असतांना निरो गिटार वाजवत होता ही प्रपृत्ती अनादी काळापासूनची असल्याने वेगळे काहीच नाही. जनतेच्या तोंडचे पाणी काढून घेण्याचा प्रकार नवा नाही.

टॅग्स :Atul Saaveअतुल सावेwater scarcityपाणी टंचाईAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका