शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

आंबेडकरांचे प्रस्ताव स्वीकारले का जात नाहीत?

By किरण अग्रवाल | Updated: April 17, 2022 12:18 IST

Prakash Ambedkar : त्यांच्या प्रस्तावांचा काँग्रेस सकारात्मक विचार करेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र ती फाेल ठरली.

- किरण अग्रवाल

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयाेगाला ‘अकाेला पॅटर्न’ म्हणून राज्यभरात जशी ओळख आहे, तशीच ओळख त्यांनी प्रत्येक निवडणुकीत केलेल्या नवनव्या राजकीय प्रयाेगांचीही आहे. परवा त्यांनी अकाेल्यातील पत्रकार परिषदेत हाेय, आम्हाला शिवसेनेसाेबतही आघाडी करायला आवडेल, हवे तर हाच आघाडीचा प्रस्ताव समजा, अशी खुली ऑफर शिवसेनेला दिली. महिनाभरापूर्वी अशीच ऑफर त्यांनी काँग्रेसला दिली हाेती. निवडणुकीचे पडघम वाजू लागले की, त्यांची अशी ऑफर गाजते, फक्त ती वाजत गाजत ‘लग्ना’पर्यंत अर्थात आघाडी गठित हाेण्यापर्यंत पाेहोचत नाहीत. असे का हाेते? याचा विचार आता वंचितने अंतर्मुख हाेऊन करण्याची वेळ आली आहे.

खरेतर आंबेडकरांनी आपल्या पक्षात काळसुसंगत बदल करून पक्षाच्या कक्षा रुंदावत नेल्या, आपणच स्थापन केलेल्या भारिप बहुजन महासंघाला थेट वंचित बहुजन आघाडीत विलीन करून आपल्या पारंपरिक मतांना ओबीसी मतांची जाेड देत गेल्या लाेकसभा व विधानसभा निवडणुकीत आपले राजकीय उपद्रवमूल्य इतर पक्षांना दाखवून दिले. त्यांच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळेच अनेक ठिकाणी काँग्रेस आघाडीची गणिते बिघडली. त्यामुळेच त्यांच्या पक्षाला भाजपाची बी टीम म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीने हिणवलेही. या पृष्ठभूमीवर त्यांच्या प्रस्तावांचा काँग्रेस सकारात्मक विचार करेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र ती फाेल ठरली. याला कारणेही तशीच आहेत. आंबेडकरांकडून आघाडीचा दिला जाणारा प्रस्ताव हा रीतसर दिला जात नाही. केवळ माध्यमांमध्ये ते बाेलतात. बहुजन मतांमध्ये विभाजन हाेऊ नये, यासाठी मी तयार आहे, असे दाखविण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असताे, तर कधी ते आपल्या पक्षाच्या क्षमतेपेक्षा जास्त जागा मागतात, असेही आराेप अनेकदा काँग्रेसकडून झाले आहेत. यात तथ्य असेल तर त्यांच्या पक्षासाेबत आघाडीची चर्चा ही माध्यमांचे रंजन याच पातळीवर भविष्यातही राहील. त्यामुळे अशा प्रस्तावांचे गांभीर्य त्यांना कृतीतून दर्शवावे लागणार आहे.

खरेतर काँग्रेस हे आंबेडकरांचे पहिले प्रेम आहे. त्यांना अकाेल्यातून लाेकसभेत मिळालेल्या प्रतिनिधित्वात काँग्रेसचा ‘हात’ महत्त्वाचाच ठरला हा इतिहास आहे, त्यामुळे आधी काँग्रेसला संधी देत नंतर इतर पक्षांचा पर्याय ते खुले ठेवत आले आहेत. डावे पक्ष, एमआयएम अशा पक्षांना साेबत घेऊन त्यांच्या पक्षाला काहीच फायदा झालेला नाही, हे आकडे सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेससाेबत त्यांचे पटत नाही, किंबहुना काँग्रेस आघाडीत सहभागी हाेण्यासाठी राष्ट्रवादी नकाे, अशीच छुपी अट त्यांची राहिली असल्याचे आराेप आहेत. भाजपासाेबत जाणे त्यांना राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे अलीकडे काही प्रमाणात सॅाफ्ट झालेली शिवसेना चालेल, या भूमिकेपर्यंत ते आले असतील, म्हणूनच शिवसेनेला त्यांनी खुली ऑफर दिली. यापूर्वीही शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र येण्याचे प्रयत्न झाले हाेते, आता आंबेडकरांनी नव्याने साद घातली आहे. अर्थात त्याला प्रतिसाद मिळताे की, त्याचेही केवळ प्रतिध्वनीच उमटत राहतात, हे काळच सांगेल.

सारांशात ॲड. आंबेडकरांच्या पक्षाला अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा अशा प्रत्येक ठिकाणी यश अनुभवता आले. मात्र गेल्या काही वर्षात त्यांच्या सामाजिक अभियांत्रिकीच्या प्रयोगाला लाेकसभा व विधानसभा निवडणुकीत यश आले नाही. आताचा काळ हा युती आघाडीचा काळ आहे. त्यामुळे सेना असाे की काँग्रेस, यांच्यासाेबत आघाडी करण्याकडे त्यांचा कल वाढला असेल तर ताे त्यांच्या काळसुसंगत धाेरणाचाच भाग आहे. फक्त ते कृतीत किती उतरते ते लवकरच कळेलच, घाेडामैदान जवळच आहे.

 

भाजपा विरोधात महाआघाडी निर्माण करून आव्हान देण्यामध्ये आंबेडकरांच्या पक्षाचे उपयुक्तता मूल्य अधिक हाेईल, हे वंचितने गेल्या निवडणुकीत कमावलेल्या मतदानातून स्पष्ट झाले आहे. तरीही त्यांना साेबत घेऊन आघाडी करण्यास प्रमुख पक्ष का धजावत नाहीत? याचाही विचार आता आंबेडकरांनी केला पाहिजे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीAkolaअकोलाPoliticsराजकारण