शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भारतीय लोक इतकी (अनावश्यक) औषधे का घेतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 08:35 IST

Medicines : इंजेक्शन द्या, सलाईन लावा असा आग्रह धरणारे, स्वत:च औषधं खात सुटलेले रुग्ण आणि आपला धर्म विसरलेले डॉक्टर्स हे सगळेच जबाबदार आहेत.

-डॉ. श्रीकांत कामतकर (निवृत्त वैद्यकीय अधिकारी, सोलापूर)

औषधांचा अतिवापर व गैरवापर करण्याच्या यादीत भारत वरच्या स्थानावर आहे, हे नुकतेच एका पाहणीत सिद्ध झाले आहे.  औषधांच्या गैरवापराचे वेगवेगळे प्रकार शोधले, तर पुष्कळ आहेत. लिहून दिलेली औषधे कमी किंवा जास्त कालावधीसाठी घेणे, कमी किंवा जास्त प्रमाणात घेणे, घेण्याची वारंवारिता विसरणे किंवा विसरण्याचे नाटक करणे, वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषध घेणे, दुसऱ्याच्या सल्ल्याने तिसऱ्याने औषध घेणे, आजार व्हायच्या आधीच भीती बाळगून औषध घेणे, औषधांविषयी स्ट्रॉंग - साधे - भारी- त्रासदायक-एकदम सेफ असे पूर्वग्रह बाळगणे. एकदा  गुण आला  की तीच लक्षणे वाटली म्हणून  परस्पर पुन्हा औषधे वापरणे, मुदत संपलेली औषधे वापरणे... या यादीत डॉक्टर्स, केमिस्ट आणि रुग्णसुद्धा भर टाकू शकतील.  

रुग्ण म्हणून डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी पूर्ण चिकित्सा करून औषध चिठ्ठीवर ‘पुढील तीन महिने जीवनशैलीत बदल’ असे लिहून दिले, तर ‘इतक्या (सामान्य) सल्ल्यासाठी एवढी फी का?’ असा प्रश्न रुग्णाच्या मनात येणार. त्याऐवजी बाजारातली नवीन महागडी, लगेच न मिळणारी औषधे (यात, मर्द बनवणारी टॉनिक्स, लगेच जादू करणारी वगैरे) लिहून दिली की  डॉक्टर एकदम भारी वाटतो. औषधाच्या निर्मितीपासून प्रत्यक्ष वापरापर्यंत असे  अनेक घटक औषधाच्या गैरवापरासाठी, अतिवापरासाठी कारणीभूत असतात. जागतिक स्तरावर औषधनिर्मिती, वितरणाचे अवाढव्य औद्योगिक साम्राज्य आहे. त्यात संशोधन, स्वामित्व हक्क कायद्यातील पळवाटा, आर्थिक उलाढाली आणि त्यामागील स्थानिक ते आंतरराष्ट्रीय, राजकीय, औद्योगिक धोरणकर्त्यांचे हस्तक्षेप असे सारे घटक आहेत.

स्थानिक औषध दुकानदार, औषध लिहून देणारे डॉक्टर्स आणि वापरणारे रुग्ण किंवा आम  जनता हे सारेच आपापल्या परीने औषधांच्या गैरवापर आणि अतिवापराला कारणीभूत असतात. औषधांच्या गैरवापरात जाहिरातबाजीचा मोठा वाटा आहे. औषधांच्या जादुई झटपट परिणामांची जाहिरात आपल्या मनाचा ठाव घेते. मग आपण ती औषधे (उगीचच) घेत राहतो. सौंदर्य संवर्धक, सेक्स टॉनिक्स, बारीक- जाड, उंच होण्याची आणि मूल होण्याची हमी देणारी औषधे या खेळात अग्रभागी असतात. रस्त्यावरच्या तंबूत जडीबुटी देणाऱ्या वैदूपासून आंतरराष्ट्रीय कंपनीपर्यंत सगळेच जण यात पारंगत आहेत.

जीवरक्षक, अत्यावश्यक आणि पूरक अशी ढोबळ वर्गवारी केली, तर अत्यावश्यक आणि पूरक औषधांचा सर्वांत जास्त गैरवापर, अतिवापर होताना आढळतो. अगदी जीवरक्षक ऑक्सिजनसारख्या औषधांचा गैरवापर कोविड लाटेत आपण पाहिला.  गैरवापर अतिवापराचे मुख्य कारण आर्थिक असते.  स्वतः मनाने औषधे कमी खर्चात घ्यायची किंवा खर्चाचा परतावा मिळतो म्हणून (गरज नसतानाही का सोडायची) असा विचार करत रुग्णही या गैरवापराचे कारण बनतात. ऐपत नसलेले रुग्णही अत्यावश्यक औषधे सोडून पूरक औषधांवर जास्त खर्च करतात, असे निरीक्षण आहे. यावर उपाय काय? पहिले म्हणजे उपचार शास्त्र हे संयमाने, सारासार विचार करून हाताळणे हा वैद्यकीय शिक्षणाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे.

 - इंजेक्शन द्या, सलाईन लावा, भारी औषधे चालू करा असे स्वयंघोषित तर्कशास्त्र रुग्णांनी लढवू नये. आपल्या औषध लेखन चिठ्ठीचे लेखापरीक्षण स्वतः करण्याची सवय डॉक्टरांना लागली पाहिजे. औषध चिठ्ठीवर  किकबॅकच्या मिळकतीची सावली  त्यावर पडू नये,  अशी डॉक्टरांकडून अपेक्षा करताना रुग्णानेही परस्पर औषधे घेणे, मनाने औषधांचे डोस कमी-जास्त करणे, आठवडाभरासाठी लिहून दिलेली  प्रतिजैविके, स्टेराॅइड्सारखी औषधे महिनोन‌्महिने घेऊ नयेत. 

डॉक्टर, रुग्णांचा परस्पर विश्वास आणि आश्वासक संवाद दृढ होणे महत्त्वाचे आहे. डॉक्टरांनी वेळ दिला पाहिजे आणि रुग्णाने डॉक्टरांच्या वेळेची कदर आणि किंमत जाणली पाहिजे. “जा तुला कुठल्याही औषधाची गरज नाही”, असे निशंक मनाने सांगणाऱ्या डॉक्टरविषयी रुग्णांच्या मनातही कुठलीच शंका असता कामा नये. उपचार करणारा विश्वासपात्र व उपचार घेणारा विश्वास ठेवणारा असला, तर औषधांचा गैरवापर, अतिवापर नक्कीच कमी होईल.

टॅग्स :medicinesऔषधं