शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

अन्वयार्थ- सगळे खापर डॉक्टरांच्या माथी का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2023 9:45 AM

घटनेचे गांभीर्य न ओळखता ऊठसूट डॉक्टर्सच्या माथी खापर फोडून आपण नामानिराळे राहणं योग्य नव्हे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पाळायला हवी.

डॉ.अंजली मुळके, माजी वैद्यकीय अधिकारी

काहीच दिवसांपूर्वी, ठाणे येथील शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेला दुर्दैवी प्रकार ताजा असतानाच, आता नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर अशा कित्येक रुग्णालयातून दुर्दैवी मृत्यूच्या तांडवाच्या बातम्या सलग येत आहेत.

खरंतर, ठाण्यातील घटना ताजी असतानाच, शासनाने जागं होत, सर्व शासकीय वैद्यकीय रुग्णालये, जिल्हा सामान्य रुग्णालये, तसेच सर्व ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपलब्ध डॉक्टर्स, कर्मचारी, तिथल्या सोयी-सुविधा आणि यंत्रणा, या सर्वांचा अहवाल मागवून घेऊन, त्यावर तत्काळ कृती करत पावलं उचलणं गरजेचं होतं; पण सरकार नेहमीप्रमाणेच इव्हेंट साजरे करण्यात मग्न होते.

प्रशासनालादेखील आपली जबाबदारी असल्याची जाणीव नाही, ही शोकांतिका आहे. संपूर्ण आरोग्य क्षेत्रच आयसीयूमध्ये मरणासन्न अवस्थेत पडलंय. कोण जबाबदार आहे याला?

कित्येक वर्षांपासून संचालक, उपसंचालक ते वैद्यकीय अधिकारी, स्टाफ, कर्मचाऱ्यांपर्यंतच्या हजारो जागा रिक्त पडून आहेत.

मागणी होऊनदेखील त्यांची भरती कित्येक वर्षांपासून केली गेलेली नाही. उलट लीपापोती म्हणून खेडोपाडी कंत्राटी डॉक्टर्स आणि स्टाफची तुटपुंजी भरती केली जाते. त्यांचं तुटपुंजं मानधनदेखील चार चार महिने रखडून ठेवलं जातं. कोणत्याच रुग्णालयीन सुविधा त्या स्तरावर दिल्या जात नाहीत. सुविधा आणि साधन उपलब्धता याबद्दल बोलायचं झालं तर उपकेंद्र ते प्राथमिक आरोग्य केंद्र, चिंता असते. ग्रामीण रुग्णालये ते उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयांपर्यंत सर्वच स्तरावर साधं सर्पदंशावरचं औषधसुद्धा बऱ्याचदा उपलब्ध नसतं.

प्रसूती कक्ष, विविध शस्त्रक्रिया आणि त्याच्या सोयींबद्दल तर बोलायलाच नको. परवाच नाशिक आणि पालघरच्या पाड्यांत गर्भिणी मृत्यू झाले. प्रसूतीसाठी गावात आरोग्य सुविधाच काय, दळणवळणाची साधनेदेखील उपलब्ध नसल्याने, त्यांना झोळीत घालून पायवाटेने निकटतम रुग्णालयात नेताना त्यांचा दुर्देवी मत्यू झाला.

 हा आहे विकास आणि प्रगती? एखादी दुर्दैवी घटना घडली, की प्रत्येक वेळी एक समिती गठित करणे, मृत्यूच्या बदल्यात मोबदला घोषित करणे, डॉक्टर आणि स्टाफना

निलंबित केलं, की आम्ही आमचं काम चोखपणे बजावलं..! फार मोठ काम केल्याचा आव आणायचा असेल, तर मग डीकडून स्वच्छतागृह धुवून घ्यायचं.!

यासाठी आहेत का लोकप्रतिनिधी ?

 लोकप्रतिनिधीदेखील समाजाचे एकप्रकारे डॉक्टरच असतात. आमच्या लोकप्रतिनिधींना समाजाचं स्वास्थ्य राखण्याची कुठं चिंता असते? त्यांना तर खुर्ची कशी टिकवायची, याचीच सर्वस्वीचिंता असते. 

जाबच विचारायचा झाला तर, स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री आणि वैद्यकीय मंत्री, विरोधी स्थानिक नेते, वेळोवेळी प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य आढावा बैठक घेतली जाते का? जिल्ह्यातील सर्व स्तरावरील रुग्णालयांत सर्व सोयी-सुविधा आहेत का? तिथे योग्य आणि पुरेशा प्रमाणात औषध पुरवठा आहे का? रुग्णालयात स्थायी, डॉक्टर आणि इतर स्टाफची पुरेशी भरती झालेली आहे का? ऑडिट्स करताना सर्व पैशांची विल्हेवाट कशी लागते, ते निदान पन्नास टक्के तरी प्रामाणिकपणे बघितलं जातं का?.. असे अनेक प्रश्न विचारता येतील. घटनेचे गांभीर्य न ओळखता उठसूट डॉक्टर्सच्या माथी खापर फोडून आपण नामानिराळे राहत, स्वत:च्या जबाबदाऱ्यांवर पांघरूण घालत आपण जनतेच्या किती कळवळ्याचे आहोत, हे दाखवणे म्हणजे शहाणपणा नव्हे..!

प्रत्येक जिल्ह्यातील, ग्रामीण भागातील रुग्णालये जर सर्व सुविधांनी युक्त, अद्ययावत असतील, तर कुठल्या एकाच जिल्ह्याच्या रुग्णालयावर आजूबाजूच्या जिल्ह्यांतील आणि इतर राज्यातील रुग्णांचा अतिरिक्त दबाव का पडेल? डॉक्टर्सवर आणि स्टाफवर अतिरिक्त गर्दीचा ताण आल्यानंतर यंत्रणा अपुरी पडतेच. यासाठी इतर पर्यायी व्यवस्था लावण्याऐवजी, स्टंटबाजी करत आरोप-प्रत्यारोप करणं म्हणजे या मृत्यूंवर तोडगा आहे का?

प्रत्येक वेळी, बैल गेला की झोपा करायचा ! कित्येक निरागस जीव गेल्यानंतर जाग यावी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. जनतेनेदेखील वेळोवेळी लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला जाब विचारणं गरजेचं आहे. डॉक्टरांवर हल्ला करण्याच्या घटना घडताना, त्याआधी जनतेनेदेखील सद्सद्विवेक बुद्धीने विचार करून, यामागील प्रणालीचा विचार करून दोषी शोधावेत. जबाबदारी सर्वांचीच आहे. अन्यथा ही परिस्थिती सुधारणार नाही.