शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

राज्यातील निवासी डॉक्टरांना कोणी वाली मिळेल का? सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

By संतोष आंधळे | Updated: August 12, 2024 09:00 IST

कोलकाता येथील आर. जे. कर सरकारी रुग्णालयात दुसऱ्या वर्षाला श्वसनविकार विभागात शिकणाऱ्या निवासी डॉक्टरची ९ ऑगस्ट रोजी बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली.

प्रासंगिक - संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी

कोलकाता येथील आर. जे. कर सरकारी रुग्णालयात दुसऱ्या वर्षाला श्वसनविकार विभागात शिकणाऱ्या निवासी डॉक्टरची ९ ऑगस्ट रोजी बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या निवासी डॉक्टरचा मृतदेह रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. मृतदेहावर अनेक जखमा आढळल्या. या प्रकारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. सरकारी रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रसंगाने केईएम रुग्णालयातील अरुणा शानबाग प्रकरणाच्या  कटु आठवणी जाग्या झाल्या. 

फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोरडा) या राष्ट्रीय पातळीवरील  निवासी डॉक्टरांच्या संघटनेने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करून डॉक्टरांना रुग्णालयात सुरक्षा पुरविली जावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच, या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण देशातील वैद्यकीय महाविद्यालयात रेसिडेंट डॉक्टर्स सोमवारपासून दिवसभरातील काही निवडक सेवा थांबवण्याचा इशारा दिला आहे. 

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांची बरी परिस्थिती असली, तरीही निवासी डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाइकांकडून आणि समाजकंटकाकडून अनेकवेळा हल्ले झाले आहेत. एखादी अनुचित घटना घडली की, तात्पुरती मलमपट्टी करायची, हे धोरण सोडून ठोस निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे.  

तहान भूक विसरून प्रचंड अभ्यास करायचा. कठीण असलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत पास व्हायचे. त्यानंतर ज्या रुग्णालयात काम करत आहोत, त्या ठिकाणी साध्या मूलभूत सुविधा नसलेल्या जागी तीन वर्षे राबायचे, रुग्णसेवा बजावत  शिक्षण घ्यायचे. राहण्यासाठी चांगली निवासाची सोय नाही. मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयांतील वसतिगृहे बरे असून, राज्यातील इतर भागांत निवासी डॉक्टरांची वसतिगृहांची परिस्थिती भयावह अशी आहे.

कोंबड्याच्या खुराड्यात राहावे, अशी अवस्था या गुणवंत विद्यार्थ्यांची आहे. कसेबसे राहून दिवस काढायचे ही त्यांची दिनचर्या. राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयांचा परिसर मोठा असून, निवासी डॉक्टरांना अनेकवेळा रुग्णसेवेसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते.  अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी दिवेही नसतात. कुत्रे भुंकत असतात. या भयभीत वातावरणात निवासी डॉक्टर त्याचे कर्तव्य पार पाडत असतो. त्यासंदर्भात तक्रारही करत नाहीत. त्यांच्या करीता किमान संपूर्ण रुग्णालय परिसरात रात्रीची गस्त सुरक्षारक्षकांनी घातली पाहिजे, यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने नियोजन करणे आवश्ययक आहे, कारण रुग्णालयात येणारा पहिला रुग्ण बघण्याचे काम हा निवासी डॉक्टर बघत असतो.

सध्याच्या घडीला राज्यात  जवळपास ११,२११ निवासी डॉक्टर्स कार्यरत आहेत. या निवासी डॉक्टरांनी दिवसभरात किती तास काम करायचे हे निश्चित नाही. २४ तास रुग्ण सेवा द्यायची. इतर राज्यांतील काही केंद्रीय सरकारच्या अखत्यारीतील वैद्यकीय संस्थेत निवासी डॉक्टरांनी किती काळ काम करावे, यावर काही नियम करण्याचे काम सुरू आहेत. त्यांना साप्ताहिक रजा असावी, यावरसुद्धा चर्चा सुरू आहे.    

नियमित डॉक्टरांवर होणाऱ्या या हल्ल्याच्या विरोधात सरकाने केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायदा आणावा, अशी मागणी केली. अनेक वर्षे इंडियन मेडिकल असोसिएशन करत आहे. या घटनेनंतर  फोरडा या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने ती मागणी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केलेल्या निवेदनात त्यांनी ही मागणी केली आहे.  निवासी डॉक्टरांवर असेच हल्ले होत राहिले, तर एके दिवशी हॅशटॅग सेव्ह रेसिडेंट डॉक्टर्स मोहीम राबवायची  वेळ येईल.

टॅग्स :doctorडॉक्टर