शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

मंगळाच्या जगात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 01:37 IST

खगोल निरीक्षणात शुक्रानंतरचा ग्रह म्हणजे मंगळ. मंगळ आपल्यासाठी नेहमीच खूपच कुतूहलाचा विषय होता. ग्रह मालिकेतील हा पहिला ग्रह जो आपल्याला रात्रभर दिसू शकतो

- अरविंद परांजपेखगोल निरीक्षणात शुक्रानंतरचा ग्रह म्हणजे मंगळ. मंगळ आपल्यासाठी नेहमीच खूपच कुतूहलाचा विषय होता. ग्रह मालिकेतील हा पहिला ग्रह जो आपल्याला रात्रभर दिसू शकतो. याची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर आहे. हा सूर्याची एक परिक्रमा १.८८ वर्षाने (पृथ्वीच्या ६८६.९८ दिवसांनी) पूर्ण करतो. तर दर २६ महिन्यांनी (२ वर्षे २ महिन्यांनी) अशी स्थिती येते की सूर्य पृथ्वी आणि मंगळ (सुमारे) एका रेषेत येतात. त्या वेळी याचा उदय सूर्यास्ताबरोबर होऊन, सूर्योदयाच्या वेळी तो पश्चिम क्षितिजावर अस्ताला जातो. तसेच दर १५ ते १७ वर्षांनी अशी स्थिती येते की त्या वेळी सर्ू्य-पृथ्वी-मंगळ एका रेषेत तर असतात पण त्याचवेळी मंगळ पण आपल्या कक्षेत सूर्याच्या जवळ आलेला असतो. या वेळी मंगळाचे निरीक्षण खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते.दुर्बिणीच्या शोधानंतर १८७७ साली मंगळ ग्रहाचे असेच निरीक्षण इटलीतीत जियोवानी शापरेली या प्रख्यात खगोल निरीक्षकानी केले. त्यांना मंगळावर काही खुणा परत परत दिसल्या. त्यानंतर त्यांनी मंगळाचा नकाशा बनवण्यास सुरुवात केली. या नकाशात त्यांनी मंगळावर काही रेषा एकमेकांना छेदून जात असल्याचे दाखवले. याना इटलीत कनाली (म्हणजे खाचांसारखे) असे म्हटले. जेव्हा ही बातमी इंग्लंडमध्ये पोहोचली तेव्हा या कनालीचे भाषांतर कॅनॉल असे झाले आणि लोकांच्या कल्पनाशक्तीला जणू पंखच फुटले.मंगळावर आपल्यासारखे किंवा आपल्याहूनही अधिक प्रगतीशील असे सजीव आहेत आणि त्यांनी मंगळाच्या ध्रुवीय भागातून विषुववृत्तीय भागावर पाणी पोहोचवण्याकरिता हे कॅनॉल बांधले आहेत असा समज पसरू लागला.मंगळावरच्या प्रगत सजीवांचा हा प्रचार करण्यात अग्रस्थानी होते अमेरिकेचे धनवान उद्योगपती पर्सिव्हल लॉवेल. यांनी आपल्या आयुष्याचे दोनच उद्देश ठेवले होते - एक तर मंगळाचे निरीक्षण करणे आणि जेव्हा आकाशात मंगळ नसेल तेव्हा मंगळाच्या या प्रगत सजीवांबद्दल व्याख्याने देत जगभर प्रवास करणे.याचा उच्चांक म्हणजे प्रख्यात विज्ञान कादंबरीकार एच.जी. वेल्स यांनी ‘वॉर आॅफ द वर्ल्ड’ ही कादंबरी लिहिली. यात त्यांनी मंगळवासी पृथ्वीवर आक्रमण करून पृथ्वी काबीज करण्याचा कसा प्रयत्न करतात आणि मग हे आक्रमण आपण कसे मोडून काढतो याचे वर्णन केले होते.या कादंबरीचे रेडिओ नाट्यरूपांतर तर इतकेप्रभावी झाले होते की लोकांना खरेच वाटले की, पृथ्वीवर मंगळवासीयांनी आक्रमण केले आहे. पण आज आपण जाणतो की मंगळावर कधी काळी सजीवांचा वास होता याबद्दल कुठलाही पुरावा मिळालेला नाही.मंगळाचा अक्ष सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या पातळीला २५ अंशाने कललेला आहे. पृथ्वीचा अक्ष साडेतेवीस अंशाने कललेला आहे. म्हणजे पृथ्वीच्या अक्षापेक्षा मंगळाचा अक्ष किंचित जास्त आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर पृथ्वीसारखेच ऋतू असतात. मंगळाच्या सूर्याच्या एका परिक्रमेत एकदा याचा उत्तर ध्रुव तर एकदा दक्षिण ध्रुव सूर्याच्या दिशेने कललेला असतो.अनेक बाबतीत मंगळ पृथ्वीसारखा आहे. पण मंगळावर वातावरण खूप विरळ आहे आणि त्यात ७५ टक्के कार्बन डाय आॅक्साईड आहे. हे विरळ वातावरण सूर्यापासून येणाऱ्या हानीकारक विकिरणांपासून आपला बचाव करू शकणार नाही. मंगळावर कमाल तापमान २० अंश तर किमान उणे १४० सेल्सिअस असते.मंगळाचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या फक्त अर्धा आहे आणि पृष्ठभागावर गुरुत्वीय बल पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या गुरुत्वीय बलाच्या ३८ टक्केच आहे. म्हणजे जर पृथ्वीवर तुमचे वजन ५० किलो असेल तर मंगळावर ते २० किलोपेक्षा कमी भरेल.मंगळ आपल्याला लाल रंगाचा दिसतो, त्यामागचे कारण म्हणजे मंगळाच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात आॅक्सिडाईज्ड लोह म्हणजेच गंज आहे. ज्याचा रंग लाल असतो. याच्या ध्रुवीय भागावर आपल्याला बर्फाचा साठा दिसतो. म्हणजे कधी काळी इथे पाणी असलं पाहिजे जे काही कारणांमुळे उडून गेले. जर या ग्रहावर पाण्याचा साठा होता तर इथे कधी काळी जीवाणूंच्या स्वरूपाचे का असेना, सजीवांचे अस्तित्व असण्याची शक्यता नाकारत येत नाही.(लेखक नेहरू तारांगणचे संचालक आहेत.)