शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

कालचा गोंधळ बरा होता!

By admin | Published: May 11, 2016 2:49 AM

विकासाचे चॉकलेट जनतेसमोर टाकले, की जनता ते चघळत बसते. इतर गोष्टीवरून तिचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा हा सोपा मार्ग आहे आणि कोणतेही सरकार असे जादूचे प्रयोग करीत असते.

विकासाचे चॉकलेट जनतेसमोर टाकले, की जनता ते चघळत बसते. इतर गोष्टीवरून तिचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा हा सोपा मार्ग आहे आणि कोणतेही सरकार असे जादूचे प्रयोग करीत असते. पूर्वीच्या काँग्रेस सरकारने केले आणि आता युतीचे सरकारही तेच करीत आहे. भौगोलिकदृष्ट्या औरंगाबादचे स्थान हे महाराष्ट्राच्या मध्यवर्ती आहे. मुंबई, पुणे, नाशिक या विकासाच्या सुवर्ण त्रिकोणानंतर औरंगाबादचा विचार होतो. आता सरकारने या शहराचा विकास करण्यासाठी औरंगाबाद महानगर विभागीय विकास प्राधिकरण स्थापण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी हा प्रयोग मुंबई-पुण्यात झाला आहे.मराठवाड्याची राजधानी असलेल्या या शहराने विकासाचे वेगवेगळे मॉडेल ऐकले. काहींचा अनुभव घेतला. शहराचा विस्तार गेल्या १५ वर्षांत वेगाने झाला आणि ३० कि़मी. परिघात ते आज विस्तारले आहे. माळीवाडा ते करमाड, वाळूज ते सावंगी असा पसारा वाढला. यातील काही भाग महानगरपालिकेच्या क्षेत्रात नाही; पण महापालिका, सिडको, झालर क्षेत्र, नऊ नगर विकास क्षेत्र, वाळूज महानगर अशा वेगवेगळ्या नावाने या परिसराचा विकास करण्याचे वारंवार घोषित झाले. यापैकी महानगरपालिका आणि सिडको यांनीच काय ते विकासाचे काम केले. औरंगाबाद शहरालगतची २८ खेडी होती. त्यांच्या विकासासाठी ३० नोव्हेंबर २००८ रोजी झालर क्षेत्राची घोषणा झाली आणि या २८ गावांचा विकास सिडकोकडे सोपविला. आता त्यातील सातारा आणि देवळाई ही दोन गावे महापालिकेत सामील झाली आहेत. झालर क्षेत्राची घोषणा करताना सरकारने या खेड्यांतील ग्रामपंचायतींचे अधिकार गोठविले आणि त्यांचा दोन वेळा विकास आराखडा तयार करण्यात आला. गेल्या आठ वर्षांत यापेक्षा वेगळे कोणतेही काम झाले नाही. येथील जमिनींचे मोठे व्यवहार झाले ते रोखता आले नाहीत. मनुष्यबळाचे कारण दाखवून सिडकोने त्याकडे लक्ष दिले नाही.यानंतर ‘नऊ नगर विकास योजना’ आली. शेंद्रा औद्योगिक परिसरालगतच्या करमाड, कुंभेफळ, लाडगाव, टोणगाव, सटाणा, हिवरा, शेंद्रा कमंगर आदि गावांसाठी ही योजना जाहीर झाली. आता त्यात जवळपास ३० गावांचा समावेश आहे. येथे जमिनीचे व्यवहार एकरऐवजी चौरस मीटरवर करण्याचा नियम होताच जमिनीचे भाव वाढले आणि विकास हा सामान्य माणसासाठी राहिला नाही. याच परिसरात ‘दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर’ असून, त्यासाठी १० हजार हेक्टर जमीन संपादन केली आहे. ९ नगर विकास योजनेची घोषणा झाली; पण समिती नेमणूक प्रक्रिया अर्धवट आहे.या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी औरंगाबाद महानगर विभागीय विकास प्राधिकरण स्थापण्याच्या हालचाली सुरू आहेत. या संपूर्ण परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्याचे काम या प्राधिकरणाकडे असेल. पायाभूत सुविधांची मोठी कामे केली जातील. मुंबईत वांद्रे-मुंबई सी लिंकचा मोठा प्रकल्प अशाच पद्धतीने पूर्ण केला. ते उदाहरण ताजेच आहे. आता या पाठोपाठ ‘महाराष्ट्र परस्पेक्टिव्ह कॉरिडॉर’ची घोषणा केली. नागपूर-मुंबई या ३० हजार कोटी खर्चाच्या महामार्गापैकी १६० कि.मी.चा पट्टा औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातून जाणार आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूस दोन कि.मी. पट्टे वाहतूक, निवास, व्यापार आदिंसाठी विकसित केले जातील, काही उपनगरे उभी राहतील असे एकूण चित्र आहे. यासाठी भूसंपादनाचे आंध्र प्रदेश पॅटर्न स्वीकारले जाईल. या सर्व प्रकल्पांची गोळाबेरीज केली तर या परिसरात विकासाचा गदारोळ उठला आहे. नेमका विकास कसा होणार, सामान्य माणसाला त्याचा थेट लाभ काय मिळणार, त्याला घर स्वस्त मिळणार का, रोजगार वाढणार का, एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी आणि त्यानंतर येथे वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी पाणी आणि इतर पायाभूत सुविधा आहेत का, या प्रश्नांची उत्तरे नाहीत आणि जनताही ती विचारत नाही. कारण ती चॉकलेटच्या गुंगीत आहे.- सुधीर महाजन