शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

‘...मेरे बाबा यहीं कहीं है, वो कहीं नही गये!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 09:01 IST

‘सुर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत’ पुरस्काराचा सन्मान प्राप्त करणारा तरुण गायक अरमान खान

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एका उभरत्या प्रतिभेशी संवाद!

‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत’ पुरस्कार मिळाल्यानंतर मनात काय आलं? मला शशी व्यास काकांनी ही बातमी सांगितली, मी आमच्या गावी बदायूॅं येथे होतो. आनंदाने माझे डोळे भरून आले. २३ मार्चला हा पुरस्कार जेव्हा प्रत्यक्ष माझ्या हातात आला तेव्हा झालेला आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही.  ‘सूर ज्योत्स्ना’ हा माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार  माझ्यासाठी आशीर्वादासारखा आहे. विजय दर्डाजी के साथ मेरे बाबाका रिश्ता बहोत पुराना था! ‘लोकमत’च्या पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात मी बाबांसोबत गायलोही होतो. 

राशिदभाईंचा मुलगा, त्यांचा शागिर्द यापेक्षाही अरमान म्हणजे राशिदभाईंची ‘परछाई’ अशी तुमची ओळख आहे. या अपेक्षांचं ओझं वाटतं का? ‘अरमान तुझ्या गाण्यात राशिदभाई दिसतात, तू राशिदभाईंची सावली आहेस’, असं लोक म्हणतात ही माझ्यासाठी मोठी सन्मानाची गोष्ट आहे. राशिद खान हे नाव पेलण्याची माझी खरंच ‘हैसियत’ आहे असं लोकांना माझं गाणं ऐकून वाटतं, तेव्हा खूप आनंद होतो. आणखी चांगलं गाण्याची प्रेरणा मिळते.

राशिदभाईंनी खूप लवकर जगाचा निरोप घेतला, त्याची हुरहुर कधीही न संपणारी. त्यांचा शागिर्द म्हणून त्यांचं राहिलेलं काम कसं पुढे नेणार ? बाबा निघून गेले आहेत, त्यांची जागा रिकामी झाली आहे. आपण त्यांना पाहू शकत नाही, त्यांना स्पर्श करू शकत नाही, त्यांच्याशी बोलू शकत नाही; हे वास्तव मला खूप त्रास देतं. पण, ते जिथे कुठे असतील तिथून ते मला पाहात आहेत, माझं गाणं ऐकत आहेत!  बाबा माझ्यासाठी ‘बिता हुआ कल’ नाहीत. माझ्यासाठी ते इथे वर्तमानात माझ्यासोबत, माझ्यासमोर, माझ्या आजूबाजूलाच असतात.. मेरे बाबा यहीं कहीं है, कहीं नही गये!  

स्वत: राशिदभाईंचे ‘अरमान’ काय होते?  त्यांच्या काय अपेक्षा होत्या? - ‘अच्छा गाओ’... बाबा मला फक्त एवढंच सांगायचे.  स्वत: बाबांवर एक दडपण कायम असायचं. निस्सार हुसेन खाॅंसाहेबांचे शिष्य, नातू अशी त्यांची ओळख होती. त्यांचा वारसा राशिदभाई चालवतात असंच लोक त्यांच्याकडे बघायचे. त्यामुळे ‘तुझ्यावरही तू राशिदभाईंचा मुलगा आहेस’ हे दडपण कायम असणार’ याची जाणीव मला बाबांनी आधीच करून दिली होती. बाबांनी कधीही ‘तू असंच गायला हवं’, असा आग्रह केला नाही. ‘खाली अच्छा गाओ’ एवढंच त्यांचं सांगणं असायचं. 

वारसा म्हणून राशिदभाईंकडून काय मिळालं? मी त्यांच्याकडून मेहनतीचं बी घेतलंय. ते स्वत: गाण्यासाठी खूप मेहनत करायचे. मी बघायचो सर्व. एकवेळ खाणं-पिणं विसर पण रियाझ आणि तोही सकाळचा  अजिबात चुकता कामा नये असा त्यांचा नियम असायचा. त्यांनी स्वत:ही तो कायम पाळला आणि मीही तो पाळतो. माझा जन्म झाल्यापासून मी सुरांसोबतच राहिलोय. लहानपणी मी तानपुरा घेऊन बसायचो तेव्हा बाबा म्हणायचे, तानपुरा वाजवतोयस ना, तर फक्त तोच वाजव. बाकी काहीच करू नकोस!...  त्या तानपुऱ्याचा स्वर कानातून शरीरात असा काही जात राहिला की दुसरीकडे कुठे मन भरकटलंच नाही. संगीत माझ्यासाठी सुकून आहे.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात पुढच्या वाटचालीबद्दल काय स्वप्नं आहेत?मला भविष्यात माझी स्वत:ची गायकी तयार करायची आहे. बाबांनी जेव्हा सादरीकरण करायला सुरुवात केली तेव्हा लोक म्हणायचे, ‘राशिद खान म्हणजे हुबहू अमीरखाॅं साहेबांची काॅपी आहे!’ आणि होतंही तसंच. पण, बाबांना ती गोष्ट सलत असे, त्यातूनच त्यांनी स्वत:ची  गायकी तयार केली. माझ्या बाबतीतही ते आता होऊ लागलंय. माझ्या गाण्यात लोकांना राशिदभाई दिसतात.. मी बाबांचा मुलगा आहे, त्यांचा काही अंश तर माझ्या गायकीत राहणारच, पण अरमान म्हणून मी काहीतरी वेगळं करून दाखवावं असं माझं स्वप्न आहे. त्यासाठी मला रसिकांचा ‘दुवा’ हवा आहे. मुलाखत : माधुरी पेठकर 

टॅग्स :sur Jyotsna awardसूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार