शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
2
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
3
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
4
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
5
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
6
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
7
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
8
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
9
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
10
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
11
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
12
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
13
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
14
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
15
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा
16
महायुतीमधील वाद विकोपाला गेले तर बसेल फटका; मीरा-भाईंदर, ऐरोली, बेलापूर, ठाणे मतदारसंघात अंतर्गत धुसफूस
17
आजारी पडू नका; खर्च नाही पेलणार, उपचारावर होणारा खर्च ११.३५% वाढला
18
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
19
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
20
ऋता आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा; व्हायरल व्हिडीओवरून परांजपे यांची मागणी

राज्यात १५ हजार शाळा, दीड लाख विद्यार्थ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 6:40 AM

२० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करण्याविरुद्ध शिक्षक-पालक एकी

- अविनाश साबापुरे लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा घाट घातल्याचा आरोप होत आहे. शिक्षण संचालनालयाने प्रत्येक जिल्ह्यातून २० पेक्षा कमी पटाच्या शाळांची माहिती मागविली आहे. ‘लोकमत’च्या पडताळणीत महाराष्ट्रात अशा १४ हजार ९८५ शाळा असून, त्यांचे अस्तित्व लवकरच लोप पावण्याची भीती निर्माण झाली आहे. १५ हजार शाळांमध्ये सरासरी १० इतकी विद्यार्थी संख्या गृहित धरली तरी एक लाख ४९ हजार ८५० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा गहन प्रश्न निर्माण होणार आहे. जाणकारांनी एकत्र येत ‘शिक्षण बचाव कृती समिती’ तयार केली आहे. 

२०१७ मध्ये शासनाने हा प्रयोग केला होता. तो आम्ही आंदोलनाने हाणून पाडला. शनिवारी केजी टू पीजी सर्व संघटना, पालक संघटना, शिक्षणतज्ज्ञ यांची सभा पुणे येथे आयोजित केली आहे.  - मधुकर काठोळे, राज्य समन्वयक, कृती समिती

नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्रमुंबई : शाळा बंद करण्याच्या कार्यवाहीबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून या शाळा बंद करण्याची कार्यवाही थांबवा, अशी मागणी केली आहे. 

१८ हजार शिक्षकांच्या नोकरीचे काय?२० पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद झाल्यास सुमारे १५ हजार शाळांमधील १८ हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. यापूर्वी राबविण्यात आलेल्या समायोजन प्रक्रियेतील घोळ लक्षात घेता, एवढ्या मोठ्या प्रमाणातील शिक्षकांचे समायोजन करताना शिक्षण खात्याची दमछाक होणार आहे. 

२० पेक्षा कमी पटाच्या जिल्हानिहाय शाळाकोकण विभाग : मुंबई ११७, पालघर ३१७, ठाणे ४४१, रत्नागिरी १,३७५, सिंधुदुर्ग ८३५, रायगड १,२९५.  नाशिक विभाग : नाशिक ३३१, जळगाव १०७, अहमदनगर ७७५, धुळे ९२, नंदूरबार १८९.  पुणे विभाग : पुणे १,१३२, सातारा १,०३९, सोलापूर ३४२, सांगली ४१५, कोल्हापूर ५०७.  औरंगाबाद विभाग : औरंगाबाद ३४७, बीड ५३३, जालना १८०, लातूर २०२, नांदेड ३९४, उस्मानाबाद १७४, परभणी १२६, हिंगोली ९३.  नागपूर विभाग : नागपूर ५५५, गोंदिया २१३, गडचिरोली ६४१, चंद्रपूर ४५१, वर्धा ३९८, भंडारा १४१.  अमरावती विभाग : अमरावती ३९४, अकोला १९३, बुलडाणा १५८, वाशिम १३३, यवतमाळ ३५०.

टॅग्स :Schoolशाळा