शहरं
Join us  
Trending Stories
1
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
2
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
3
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
4
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
5
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
6
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
7
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
8
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
9
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
10
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
11
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
12
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
13
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
14
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
15
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
16
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
17
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
18
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
19
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
20
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या

राज्यातील तब्बल ५०९ शाळांना टाळे! विद्यार्थी संख्येत मात्र झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 6:27 AM

कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर टांगती तलवार असताना, राज्यातील तब्बल ५०९ शाळांना टाळे लागल्याचे वास्तव समोर आले आहे.

मुंबई :

कमी पटसंख्या असलेल्या शाळांवर टांगती तलवार असताना, राज्यातील तब्बल ५०९ शाळांना टाळे लागल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यात शैक्षणिक वर्ष २०२०-२१ वर्षात राज्यात १ लाख १० हजार ११४ शाळा अस्तित्वात होत्या. मात्र, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात त्यामधील विविध व्यवस्थापनांच्या ५०९ शाळा बंद झाल्या आहेत. शाळा बंद झाल्यामुळे शिक्षक संख्येतही १५ हजारांहून अधिकची घट झाली आहे, तर मागील वर्षीपेक्षा यंदाच्या विद्यार्थी प्रवेशांत मात्र ७४ हजार ८५६ विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे. 

राज्यात सध्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची काय स्थिती आहे, याची माहिती शिक्षण विभागाकडून शासनाने मागविल्यानंतर असंतोष निर्माण झाला आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर न करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून केली जात आहे. 

मराठी अभ्यास केंद्राकडून मराठी शाळांसाठी बृहत आराखडा सादर करून, ग्रामीण आणि आवश्यकता असलेल्या भागात २,५०० शाळांची आवश्यकता असल्याचे निवेदन शासनास सादर करून, त्याला मान्यता मागितली होती. मात्र, २०१७ साली तो रद्द करण्यात आल्याने जिथे आवश्यकता होती, तेथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. विद्यार्थी संख्या वाढत असताना, शाळांची संख्या घटल्यास ते हानिकारक असेल. - सुशील शेजुळे, समन्वयक, मराठी शाळा संस्थाचालक संघ

शाळा, विद्यार्थी व शिक्षक संख्यावर्ष    २०२०-२१    २०२१-२२राज्यातील शाळा    १,१०,११४    १,०९,६०५ शिक्षक संख्या    ७,६६,९१६    ७,४८,५८९ विद्यार्थी संख्या    २,२५,११,८३९    २,२५,८६,६९५

टॅग्स :Educationशिक्षण