शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सीबीएसई बारावीचे मूल्यांकन दहावी, अकरावीसह पूर्वपरीक्षेतील कामगिरीआधारे; समितीच्या बैठकीत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 05:06 IST

शिक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मूल्यमापन करताना प्रत्येक घटकाला किती महत्त्व द्यायचे, याबाबत मतभेद समोर आले. परंतु या निकषाबाबत अंतिम निर्णय सीबीएसई बोर्ड घेणार आहे. १

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सीबीएसई १२ वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन १० वी आणि ११ वीमध्ये वार्षिक परीक्षेत मिळालेले गुण आणि १२ वीच्या पूर्वपरीक्षेतील त्यांच्या कामगिरीआधारे केले जाण्याची शक्यता आहे. मूल्यमापनाचे निकष ठरवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि सीबीएसई बोर्डाने गठित केलेल्या १२ तज्ज्ञांची समिती यांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली आहे. 

शिक्षण मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, मूल्यमापन करताना प्रत्येक घटकाला किती महत्त्व द्यायचे, याबाबत मतभेद समोर आले. परंतु या निकषाबाबत अंतिम निर्णय सीबीएसई बोर्ड घेणार आहे. १ जूनरोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका लक्षात घेता ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी ही परीक्षा घेण्याची तयारी दर्शविली होती, परंतु महाराष्ट्रासह दिल्ली, गोवा आदी राज्यांनी प्रत्यक्ष परीक्षा घेण्यास विरोध दर्शविला होता. सुप्रीम कोर्टानेही बोर्डाला मूल्यांकनाचे निकष ठरवण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती.

विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे वस्तुनिष्ठ प्रतिबिंब १० वीच्या निकालातून दिसून येत असल्याने १२ वीचे मूल्यांकन करताना याचा आधार घेतला जावा, असे समितीच्या सदस्यांचे मत होते, तर बारावीच्या पूर्वपरीक्षेसाठी पुरेशी तयारी न करू शकलेल्यांच्याबाबतीत ११ वीच्या निकालाचा आधार घेतला जावा, अशी चर्चा या बैठकीत झाली. तसेच १२ वीचे मूल्यांकन करावयाचे असल्याने याच्या पूर्वपरीक्षेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा विचार केलाच गेला पाहिजे, अशी चर्चा या बैठकीत झाल्याचे शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षा