शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

सीबीएसईचा दहावीचा निकाल ९३.६० टक्के; ९ टक्के विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण

By रेश्मा शिवडेकर | Updated: May 13, 2024 14:23 IST

देशभरात २,१२,३८४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.

मुंबई - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) फेब्रुवारी-मार्च, २०२४मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ९३.६० टक्के इतका लागला आहे. देशभरातून २५,७२४ शाळांमधून २२ लाख ३८ हजार८२७ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी २० लाख ९५ हजार ४६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णततेत ०.४८ टक्के इतकी वाढ झाली आहे.

मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत अधिक म्हणजे ९४.७५ टक्के तर मुलांचा ९२.७१ टक्के इतका लागला आहे. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल ९६.४६ टक्के इतका लागला आहे.

नवोद्य, केंद्रीय विद्यालयांचा निकाल सर्वाधिकनवोद्य आणि केंद्रीय विद्यालयांचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९९.०९ टक्के लागला आहे. तर खासगी शाळांचा निकाल ९४.५४ टक्के इतका आहे. तसेच सरकारी व अनुदानित शाळांचा निकाल अनुक्रमे ८६.७२ आणि ८३.९५ टक्के लागला आहे. सेंट्रल तिबेटियन स्कुलचा निकाल ९४.४० टक्के लागला आहे.

९ टक्के विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुणदेशभरात २,१२,३८४ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. हे प्रमाण ९.४९ टक्के इतके आहे. तर ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे ४७,९८३ विद्यार्थी असून त्यांचे प्रमाण २.१४ टक्के इतके आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढलीसीबीएसईच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली असली तरी दहावीच्या विद्यार्थ्यांची वाढलेली दिसून येते. गेल्या वर्षी दहावीला नोंदणी केलेल्या २१,८४,११७ विद्यार्थ्यांपैकी २१,६५,८०५ विद्यार्थी परीक्षेच्या बसले होते. यंदा हे प्रमाण अनुक्रमे २२,५१,८१२ आणि २२,३८,८२७ वर गेले आहे.

लडाख, त्रिपुरामध्ये प्रथमच परीक्षायंदा सीबीएसईने प्रथमच लडाखमधील १५५ सरकारी शाळांमध्ये (११६ दहावीच्या, ३९ बारावीच्या) दहावी-बारावीची परीक्षा घेतली होती. दोन्ही मिळून ७५ केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. तर त्रिपुरात १२४ विद्या ज्योती शाळांमध्ये परीक्षा घेण्यात आली.