शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

२७०० मुलांचे शिक्षण बंद! ‘मिशन झीरो ड्रॉप आऊट’ मध्ये समोर आले भीषण वास्तव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2022 07:10 IST

कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने ही शोध मोहीम राज्यातील सर्व भागांत प्रभावीपणे पूर्ण करता आली नसल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात ५ ते २० जुलैदरम्यान राज्यभरात ही मोहीम राबविण्यात आली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविडमुळे अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाली. या मुलांचा शोध घेण्यासाठी शासनाच्या सर्व शासकीय विभागांनी एकत्र येऊन राबविलेल्या ‘मिशन झीरो ड्रॉप आउट’ मोहिमेत मुंबई विभागात २,७५७ मुले शाळाबाह्य झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर तसेच रायगड, पालघर, बृहन्मुंबई मनपा आणि ठाणे या जिल्ह्यांतील मिळून ३ ते १८ वयोगटातील आतापर्यंत कधीच शाळेत न गेलेली आणि अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाह्य झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २ हजार ७०० हून अधिक असल्याची परिस्थिती मिशन झीरो ड्रॉप आउट मोहिमेतील समिती सदस्यांनी मांडली आहे. दरम्यान, मिशन झीरो ड्रॉप आउटचे उद्दिष्ट समोर ठेवून या मोहिमेसाठी गठित समितीकडून या सर्व मुलांना शाळेत दाखल करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

कोरोनाच्या २ वर्षांच्या काळात अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या शाळाबाह्य होण्याची कारणे अनेक असून, अशा स्थलांतरित, शाळाबाह्य बालकांचे शिक्षण थांबू नये यासाठी राज्यात मार्च २०२१ मध्ये शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम राबविण्यात आली. 

 बालकामगारांचाही समावेश मिशन झीरो ड्रॉप आउट या मोहिमेत मुंबई विभागात शाळाबाह्य ठरलेल्या विद्यार्थी संख्येमध्ये बालकामगार आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.  पालघर जिल्ह्यात सर्वाधिक बालकामगार असून, मुंबई विभागातील एकूण बालकामगारांची संख्या १२, तर विशेष गरजा असलेल्या मुलांची संख्या ४७ आहे. त्यामुळे अन्य कारणांमुळे शाळाबाह्य झालेले विद्यार्थी २ हजार ६९८ आहेत.

अनियमित उपस्थितीमुळे मुले शाळाबाह्यकोविड काळात अनेक पालकांना आर्थिक परिस्थितीमुळे स्थलांतर करावे लागले. त्यामुळे या काळात अनेक मुलांची शाळांतील उपस्थिती अनियमित झाली. परिणामी ही मुले शाळाबाह्य ठरली. मुंबई विभागात अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असून, या विद्यर्थ्यांची संख्या १ हजार ९०० हून अधिक आहे. पालघर जिल्ह्यात हे प्रमाण सर्वाधिक असून, अनियमित असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८१० आहे. यामध्ये शाळेत अनियमित असणाऱ्या मुला-मुलींच्या संख्येत फारसा फरक नसून मुलांची संख्या ९७३, तर मुलींची संख्या ९६६ आहे.८०० हून अधिक मुले कधीच शाळेत नाहीत  मिशन झीरो ड्रॉप आउट मोहिमेत ३ ते १८ वयोगटातील ८०८ मुले ही आतापर्यंत कधीच शाळेत गेली नसल्याची माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली आहे.  यामध्ये दक्षिण, उत्तर व पश्चिम मुंबईमधील २०, रायगडमधील ३४, पालघरमधील १९६ मुलांचा समावेश आहे.  मनपातील ११७, तर ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ४०४ मुलांचा समावेशही यामध्ये आहे.  या आकडेवारीनुसार मुंबई विभागातील कधीही शाळेत न गेलेल्या मुलांमध्ये ४२५ मुले आणि ३८३ मुलींचा समावेश आहे. 

कोविडच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने ही शोध मोहीम राज्यातील सर्व भागांत प्रभावीपणे पूर्ण करता आली नसल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात ५ ते २० जुलैदरम्यान राज्यभरात ही मोहीम राबविण्यात आली. 

टॅग्स :Schoolशाळा