शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
2
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
3
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
4
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
5
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
6
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
7
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने
8
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
9
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
10
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
11
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
12
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
13
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
14
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
15
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
16
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
17
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
18
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
19
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

असेल गृहपाठ तरच राहील मान ताठ..!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 10:36 AM

मुलांवरील अभ्यासाचे ओझे कमी करण्यासाठी आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा विचार सुरू असल्याचे सूतोवाच शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतेच केले. त्यावर शिक्षण क्षेत्रातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत... 

विवेक पंडित, अध्यक्ष, विद्या निकेतन, डोंबिवली उद्याच्या भारताचे नागरिक घडविण्याचे काम शाळा करत असतात. आपल्या हातून उत्तम नागरिक घडावा, यासाठी प्रत्येक शिक्षक आटोकाट प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्याने मनापासून करावा, अशी इच्छा शिक्षकांनी बाळगणे अगदी रास्तच आहे. त्या अनुषंगाने गृहपाठाचा आग्रह धरला जातो. मात्र, हल्लीच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच इतरही क्षेत्रांत चमकण्यासाठी अनेक संधी उपलब्ध असतात. अशावेळी विद्यार्थ्यांना गृहपाठ देणे योग्य की अयोग्य, याचा ऊहापोह होणे ही सध्याची गरज आहेच. 

अंतिमत: फायदा विद्यार्थ्यालाचशाळेत एकाच दिवशी एखादा धडा पूर्ण शिकवला जातोच, असे नाही. गृहपाठ करून आलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी शाळेत संबंधित विषयाचा तोच धडा समजून घेण्यास कमी अडचणी येतात. किंबहुना गृहपाठ केला असल्याने त्यांना धडा अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होते. अंतिमत: त्याचा फायदा विद्यार्थ्यालाच होतो. 

अतिरेक नकोच...विद्यार्थ्यांना गृहपाठ देतेवेळी त्याचा अतिरेक होणार नाही, याचे भान बाळगले जायला हवे. गृहपाठ आटोपशीर दिला जावा. कारण अभ्यासाच्या दबावाखाली मुलांचे बालपण दबून जायला नको. त्यामुळे कमी गृहपाठ असल्यास मुलांना खेळ वा अन्य छंद जोपासता येतील. अन्यथा गृहपाठाच्या ओझ्याखाली त्यांच्यातील खेळकर, खोडकरपणा विझून जाईल आणि त्यातून देशाचेच नुकसान होईल. 

स्व-अभ्यासाची मुळे घट्ट रुजतात...शाळेतून घरी परतल्यावर विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे काहीसे कमी होते. मात्र, शाळेत दिवसभरात आपण काय शिकलो, याची उजळणी वा लसावि म्हणजे गृहपाठ होय. विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जाणे केव्हाही योग्यच. कारण त्यामुळे घरी लिखाणाची सवय होते, सराव होतो. स्वत: वाचून आणि समजून लिहिण्याची सवय लागते. स्व-अभ्यासाची पाळेमुळे इथेच, याच वयात घट्ट रुजण्यास मदत होते. शिवाय लिखाणामुळे अक्षर सुधारण्यास मदत होते, ती वेगळीच. 

गृहपाठ देतेवेळी शिक्षकांनी पुढील बाबी लक्षात घ्याव्यात

  • केवळ नियम म्हणून गृहपाठ दिला जाऊ नये. शाळेतच नव्हे तर घरीही मुलांनी ज्या धड्याचे मनन आणि लेखन करणे आवश्यक आहे, त्याचाच गृहपाठ दिला जावा. 
  • स्वत:च्या विषयाव्यतिरिक्त अन्य विषयही महत्त्वाचे असतात. त्यामुळे अन्य विषयांचे शिक्षकही गृहपाठ देऊ शकतात, याचे भान बाळगावे.
  • संबंधित वर्गाच्या शिक्षकांमध्ये कोणी किती गृहपाठ दिला आहे, त्याची तपासणी कधी होणार आहे, यासंदर्भातील समन्वय शिक्षकांमध्ये असणे गरजेचे आहे. 
  • एखाद्या विषयासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) काढत शिक्षण विभाग आपली जबाबदारी पूर्ण करते. मात्र, संबंधित जीआरची प्रत्यक्ष अंमलबजावणी काटेकोरपणे होते की नाही, याची खात्री करून घेणारी सक्षम यंत्रणा सध्या तरी अस्तित्वात नाही. ती जमिनीवर दिसावी, याकडे लक्ष दिले जाणे गरजेचे आहे.
टॅग्स :SchoolशाळाMaharashtraमहाराष्ट्र