शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

अकरावी प्रवेश प्रक्रिया : आतापर्यंत ३ लाख ७२ हजार ५२ प्रवेश निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2021 08:48 IST

Maharashtra 11th Admission : आतापर्यंत झालेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वाधिक प्रवेश हे नाशिक शहरात झाले असून प्रवेशाची टक्केवारी ७५.८९ टक्के आहे.

मुंबई :  ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अकरावी प्रवेश घेतले नाहीत, त्यांना प्रवेशाची आणखी एक संधी शिक्षण संचालनालयाने दिली आहे. या शेवटच्या फेरीसाठी राज्यात १ लाख ६३ हजार ९७८ जागा रिक्त आहेत. यात सर्वाधिक जागा रिक्त राहण्याचे प्रमाण नागपूर जिल्ह्यात असून तेथे एकूण प्रवेशाच्या ४२ टक्के जागा रिक्त आहेत. तर सर्वात कमी जागा नाशिक जिल्ह्यात उपलब्ध असून जागा रिक्त राहण्याचे प्रमाण २४ टक्के आहे. आतापर्यंत झालेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये सर्वाधिक प्रवेश हे नाशिक शहरात झाले असून प्रवेशाची टक्केवारी ७५.८९ टक्के आहे. उपलब्ध असलेल्या २५,८३० जागांपैकी १९,२६१ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून अंतिम फेरीसाठी आता ६,११९ जागा उपलब्ध आहेत. नागपुरात अकरावीचे सगळ्यात कमी प्रवेश झाले आहेत. उपलब्ध असलेल्या ५९,१९५ जागांपैकी केवळ ३३,९५० जागांवर प्रवेश होऊ शकले आहेत आणि आता २५,२४५ जागा पुढील फेरीसाठी उपलब्ध आहेत. 

८७,००० जागा मुंबई विभागात अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या फेरीसाठी मुंबई विभागात ८७,५९८ जागा उपलब्ध आहेत. मुंबईत ३ लाख २१,७८० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी २ लाख ३४ हजार १८२ जागांवर आतापर्यंत प्रवेश निश्चित झाले आहेत. रिक्त जागांची टक्केवारी २७ टक्के इतकी आहे. 

राज्यात ५ लाख ३६ हजार ०३० जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या त्यापैकी ६९ टक्के जागांवर प्रवेश निश्चित झाले असून ३१ टक्के जागा रिक्त असून पुढील शेवटच्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत.

शेवटच्या फेरीसाठी राज्यातील अकरावी प्रवेशाच्या उपलब्ध जागा विभाग     प्रवेश क्षमता     प्रवेश निश्चित     रिक्त जागा अमरावती     १६२३०    १०४६६    ५७६४मुंबई     ३,२१,७८०    २,३४,१८२    ८७, ५९८नागपूर    ५९,१९५    ३३,९५०    २५२४५नाशिक    २५३८०     १९२६१    ६११९पुणे     १,१३,४४५    ७४,१९३    ३९,२५२एकूण    ५,३६,०३०    ३,७२,०५२    १,६३,९७८

टॅग्स :collegeमहाविद्यालयEducationशिक्षण