शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्यात चुका, संदिग्धता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 09:17 IST

शिक्षणतज्ज्ञांच्या चर्चेत पुनर्लेखनाची एकमुखी मागणी

मुंबई : महाराष्ट्राने सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांच्या बाबतीत देशाचे नेतृत्व केले आहे. त्याचे प्रतिबिंब राज्याच्या अभ्यासक्रम आराखड्यात उमटलेले दिसत नाही. तसेच, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या आधारे तयार केलेल्या राज्याच्या आराखड्यात अनेक चुका आणि त्रुटी आहेत. त्यामुळे तो संदिग्ध, समजण्यास कठीण आहे.

असा आराखडा अभिप्रायासाठी  वापरणे म्हणजे सर्वांचाच वेळ वाया घालवण्यासारखे आहे. त्यामुळे हा आराखडा सरकारने मागे घ्यावा आणि नव्याने समित्या स्थापन करून त्याचे पुनर्लेखन करावे, अशी भूमिका यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विकास मंचातर्फे आयोजित शिक्षण कट्टा या चर्चेत घेण्यात आली.

राज्य अभ्यासक्रम आराखड्यावरील चर्चेत मंचाचे मुख्य संयोजक डॉ. वसंत काळपांडे, बालभारतीच्या माजी विद्यासचिव धनवंती हर्डीकर, शिक्षण अभ्यासक किशोर दरक, माजी शिक्षण संचालक भाऊ गावंडे, बसंती रॉय, सूर्यकांत कुलकर्णी, भाऊसाहेब चासकर, सुभाष मोरे, सुशील शेजुळे, महेंद्र गणपुले आदींनी सहभाग घेतला.

राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात सर्व बाबी सविस्तर आणि योग्य पद्धतीने मांडल्या आहेत. राज्य अभ्यासक्रम आराखड्यात त्याचे योग्य भाषांतर व्हायला हवे होते. मात्र, यात अनेक महत्त्वाच्या बाबी गाळल्या आहेत. हा आराखडा फक्त मराठी माध्यमाच्या शाळांना विचारात घेऊनच केलेला दिसतो. राज्यातील अनेक भाषा माध्यमांचा विचार यात दिसत नाही. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार आपण महाराष्ट्रात नेमके काय करणार आहोत, याचे चित्र त्यात उमटत नाही.- डॉ. वसंत काळपांडे

हे राष्ट्रीय आराखड्याचे सुमार दर्जाचे भाषांतर आहे. हा खूप महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आपल्या लोकशाही देशात संविधानाच्या तात्त्विक चौकटीला जे महत्त्व आहे तेच शिक्षणात राज्य अभ्यासक्रम आराखड्याला आहे. परंतु, तो गांभीर्याने तयार झालेला दिसत नाही. तो मागे घेऊन त्याचे पुनर्लेखन करावे आणि मग तो अभिप्रायार्थ ठेवावा.- धनवंती हर्डीकर

टॅग्स :Educationशिक्षण