शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

...तर नववीऐवजी आठवीलाच नापास; नियमात स्पष्टता आणण्याची शिक्षण क्षेत्रातून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 06:34 IST

यंदापासून पाचवी-आठवीला तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपाची वार्षिक परीक्षा घेऊन अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला पुनर्परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या अटीवर पुढील इयत्तेत प्रवेश दिला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लागावी आणि पुढील आव्हाने-स्पर्धांसाठी तयार होता यावे, यासाठी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा लागू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. मात्र, त्यामुळे दहावीचा निकाल वाढविण्यासाठी नववीऐवजी आठवीलाच नापास करण्याचा प्रकार वाढू शकतो, याकडे काही शिक्षकांनी लक्ष वेधले, तसेच अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करण्यासाठी मिळालेला वेळही पुरेसा नसून त्याबाबत पुरेशी स्पष्टता यावी, अशी अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली.

यंदापासून पाचवी-आठवीला तोंडी, प्रात्यक्षिक व लेखी स्वरूपाची वार्षिक परीक्षा घेऊन अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला पुनर्परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या अटीवर पुढील इयत्तेत प्रवेश दिला जाणार आहे. एप्रिलमध्ये निकाल लागल्यानंतर पुनर्परीक्षा जून-जुलैमध्ये घेतली जाईल, परंतु ‘३० एप्रिलनंतर शाळेला सुट्टी लागते. संपूर्ण मे महिना सुट्टीत जातो. शाळा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. त्यानंतर, लगेचच पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. एप्रिलमध्ये मिळणारे अवघे १० ते १२ आणि जूनमध्ये मिळणारे १० ते १२ दिवस या साधारण २० ते २५ दिवसांत विद्यार्थ्यांना वर्षभरात शिकविलेल्या विषयाची तयारी कशी करून घ्यायची, असा प्रश्न आहे. त्यामुळे पूरक मार्गदर्शनाबाबत पुरेशी स्पष्टता यायला हवी,’ अशी अपेक्षा ‘लायन एम.पी. भुता सायन सार्वजनिक स्कूल’चे मुख्याध्यापक जगदीश इंदलकर यांनी व्यक्त केली.

भीती अनाठायीकाही शिक्षकांनी ही भीती अनाठायी असल्याचे म्हटले आहे. ‘परीक्षा व्यवस्थेचे सनियंत्रण करण्यासाठी ‘राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे’च्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. याशिवाय तालुका, जिल्हा स्तरावर समित्या कार्यरत असतील. ज्या शिक्षकांना आपल्या मुलांच्या निकालाविषयी शंका असतील, त्यांना या समितीकडे दाद मागता येईल,’ अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले यांनी व्यक्त केली.

बाह्य पर्यवेक्षण आवश्यक  दुसरे म्हणजे ‘अनेकदा दहावीचा निकाल चांगला लागावा, म्हणून कच्च्या विद्यार्थ्यांना नववीत अनुत्तीर्ण करण्याकडे काही खासगी शाळांचा कल असतो. हा प्रकार आता आठवीतच होऊ लागेल,’ अशी भीती एका शिक्षकाने व्यक्त केली.  त्यामुळे शाळांच्या परीक्षा-निकाल पद्धतीत पारदर्शकता यायला हवी आणि या सगळ्याचे बाह्य पर्यवेक्षण होणे आवश्यक आहे, अशी गरज व्यक्त होत आहे.

परीक्षा कशी होणार?  शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता आठवीपर्यंत महाराष्ट्रात सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती लागू आहे. त्यानुसार, एकच एक वार्षिक परीक्षेनुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत नव्हते.  परीक्षेचे दडपण न राहिल्याने मुले अभ्यास करत नाहीत, अशी सार्वत्रिक ओरड होत हाेती. त्यामुळे पाचवी आणि आठवीकरिता पुन्हा एकदा वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यानुसार, दोन्ही इयत्तांकरिता प्रत्येक विषयासाठी ५० ते ६० गुणांसाठी ही परीक्षा होईल. भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांकरिता ही परीक्षा घेतली जाणार आहे.  अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे का, हे तपासले जाईल. ही वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्यात घेतली जाईल. किमान ३५ टक्के गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असतील. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पूरक मार्गदर्शन करून पुनर्परीक्षा घेतली जाईल. मात्र, याही परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात बसविले जाईल. 

टॅग्स :Schoolशाळा