शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विद्यार्थ्यांची पसंती आयटीआयला! ७१ हजारांहून अधिक जणांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2023 10:22 IST

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत ११ जुलैपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्यभरातून अवघ्या चार दिवसांत ७१ हजार ३७४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याखेरीज ६२ हजार ४६० विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण केले असून आतापर्यंत ५९ हजार ३८९ विद्यार्थ्यांनी शुल्कही भरले आहे. विद्यार्थ्यांना ११ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

या प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी २० जुलै रोजी जाहीर होणार आहे. प्रवेश प्रक्रियेत चार फेऱ्या राबविण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्व शासकीय आणि खासगी आयटीआयमधील रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरीद्वारे भरण्यात येतील. यासाठी संस्थास्तरीय समुपदेशन फेरी २६ ऑगस्ट रोजी होणार आहे. तसेच संस्थास्तरीय प्रवेश फेरीनंतर खासगी आयटीआयमध्ये रिक्त राहिलेल्या जागा संबंधित भरण्यासाठी २१ जुलै रोजी प्रवेश फेरी घेण्यात येणार आहे.

यंदा तीन नव्हे, तर पाच फेऱ्या

  • आयटीआय प्रवेश प्रक्रियेसाठीच्या अर्ज नोंदणीला सोमवारपासून ऑनलाइन पद्धतीने सुरुवात करण्यात आली आहे.
  • गेल्या तीन-चार वर्षांपासून तीन नियमित फेऱ्या आणि एक समुपदेशन फेरी अशी प्रक्रिया होत होती.
  • यंदा मात्र काही छोटे बदल प्रवेश प्रक्रियेत करण्यात आले आहेत.
  • नियमित तीन, एक व्यवस्थापन आणि एक समुपदेशन अशा एकूण पाच फेऱ्या प्रवेश प्रक्रियेत होणार आहेत.

महत्त्वाची आकडेवारीएकूण नोंदणी- ७१,३७४ अर्ज पूर्ण- ६२,४६० शुल्क पूर्तता- ५९,३८९

प्रवेश पद्धती, नियमावली, प्रवेश संकेतस्थळ याबाबत काही माहिती किंवा शंका असल्यास जवळच्या आयटीआयमध्ये संपर्क साधावा. प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी प्रत्येक शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये सकाळी १० ते ११ या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येते. -दिगंबर दळवी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजEducationशिक्षणCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन