शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
2
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
3
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
4
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
5
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
6
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
7
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
8
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
9
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
10
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
11
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खंत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
13
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
14
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
15
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
16
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
17
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
18
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
19
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
20
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप

विद्यार्थ्यांना मिळाली गतवर्षीची प्रश्नपत्रिका; विधी अभ्यासक्रमात विद्यापीठाच्या गोंधळाचा फटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 6:54 AM

परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्याने विद्यार्थी सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयात पोहचले. परीक्षा एक तास पुढे ढकलल्याने विद्यार्थी तणावाखाली होते.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठाकडून विधी अभ्यासक्रमाच्या द्वितीय सत्र विधी शाखेच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. मात्र ‘कॉन्स्टिट्यूशन लॉ’ विषयाच्या पहिल्याच पेपरला विद्यापीठाने घातलेल्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसला. विद्यापीठाने महाविद्यालयांना गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका पाठवल्याने परीक्षा तब्बल तासभर उशिराने सुरू करण्याची वेळ महाविद्यालयांवर आली. 

परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार असल्याने विद्यार्थी सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयात पोहचले. मात्र परीक्षा सुरू झाल्यानंतर देण्यात आलेला पेपर हा गतवर्षीचा असल्याचे लक्षात आले. ही बाब महाविद्यालयांनी तातडीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला कळविली. त्यानंतर विद्यापीठाने परीक्षा एक तासासाठी पुढे ढकलण्याच्या सूचना महाविद्यालयांना दिल्या. परीक्षा एक तास पुढे ढकलल्याने विद्यार्थी तणावाखाली होते. काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा का पुढे ढकलली याचे उत्तरच मिळाले नसल्याने त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला.

राज्यपाल, मंत्र्यांकडे विद्यार्थ्यांसाठी नाही वेळ  विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदने दिली. परंतु महाराष्ट्रातील सद्यस्थितीत सुरू असलेल्या राजकीय नाट्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या खात्याकडे लक्ष घातल्याचे दिसत नाही.  कारण मुंबई विद्यापीठातील सर्व प्रमुख अधिकारी हे प्रभारी असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत असल्याची टीका युवासेनेचे माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली आहे.  

‘जबाबदार अधिकाऱ्याची हकालपट्टी करा’  ऐन परीक्षेच्यावेळी प्रश्नपत्रिका काढून घेतल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांना परीक्षा व मूल्यमापन संचालक मंडळाने योग्य न्याय द्यावा, मात्र जबाबदार अधिकाऱ्याची हकालपट्टी करावी, अशी मागणी मनविसेचे सहसचिव संतोष धोत्रे यांनी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आले.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ