शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

‘त्या’ पुस्तकांची योजना सरकारने गुंडाळली...! बालभारतीकडून लवकरच पुस्तके बदलली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2023 8:38 AM

निपुण भारत अभियानानुसार दिलेल्या नवीन अध्ययन निष्पत्तीच्या आधारे अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यांची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्राथमिक स्तरापासून विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्दांची ओळख व्हावी त्याच प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे या हेतूने राज्यातील सर्व प्राथमिक शाळांमध्ये मराठी आणि उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून रद्द करण्यात आला आहे. 

निपुण भारत अभियानानुसार दिलेल्या नवीन अध्ययन निष्पत्तीच्या आधारे अभ्यासक्रम व पाठ्यक्रम यांची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर सद्यस्थितीत राज्यातील मराठी आणि उर्दू माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये वितरित करण्यात आलेली एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके बदलण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.मविआ सरकारच्या काळात  सृजन बदल एकात्मिक व द्विभाषिक स्वरूपात मिळतील तसेच शिक्षण, विचारांसह कल्पकतेला वाव देत दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती बालभारतीकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला.  पाठ्यपुस्तक मंडळाने इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक द्विभाषिक पाठ्यपुस्तकांची निर्मिती करून इयत्ता पहिलीची पाठ्यपुस्तके शासनाच्या सर्व शाळांमध्ये तसेच इयत्ता दुसरीची पाठ्यपुस्तके केवळ ४८८ आदर्श शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वितरित केली होती. 

मात्र आता  एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकांची अमंलबजावणी करताना काही बाबी निदर्शनास आल्याने शालेय शिक्षण विभागाकडून या पुस्तकांच्या पुढील निर्मितीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

पुस्तके रद्द करण्याची कारणेया पाठ्यपुस्तकांच्या अनुषंगाने समाजामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तसेच प्रत्यक्ष अध्यापन करणाऱ्या शिक्षकांशी चर्चा केली असता, द्विभाषिक पद्धतीचा वापर करताना विद्यार्थ्यांना मूळ भाषा शिकण्यात अडचणी येत असल्याचे व त्यामुळे मूळ भाषेचे (मातृभाषा) शिक्षण योग्य प्रकारे होत नसल्याचे आढळून आले आहे.एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तके ही विशिष्ट सूत्राभोवती (थीम) गुंफलेली असल्यामुळे मराठी भाषा, इंग्रजी भाषा व गणित या विषयांची तर्कसंगत मांडणी करताना तसेच व्याकरणाचे शिक्षण देताना अनेक अडचणी येत असल्याचे आढळून आले आहे.

निपुण भारत अभियानानुसार नवीन अध्ययन निष्पत्तीचा स्तर निश्चित करण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी पूर्व प्राथमिक (बालवाटिका, बालवाडी व अंगणवाडी) स्तरापासून ते इयत्ता तिसरीपर्यंत करण्यासाठीचे केंद्र शासनाचे निर्देश/सूचना आहेत. दरम्यान, निपुण भारत अभियानामध्ये नमूद केलेल्या अध्ययन निष्पत्तीच्या स्तरापेक्षा एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकासाठी वापरलेल्या अध्ययन निष्पत्तींचा स्तर कमी दर्जाचा असून, जुन्या अभ्यासक्रमावर आधारित आहे.