शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
2
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
3
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
4
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
6
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
7
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
8
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 
9
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
10
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
11
नवरात्रात लक्ष्मी नारायण योग: ९ राशींना अनुकूल, अचानक धनलाभ; अनेकविध शुभ फले, पण...
12
Amit Shah : २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्प्यात - अमित शाह 
13
CPL 2024 : प्रीती झिंटाची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर अभिनेत्रीच्या संघानं जिंकली ट्रॉफी
14
रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."
15
तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाच्या आरोपांनंतर बिहारमध्ये खळबळ  
16
SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअर धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण
17
IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या
18
हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट
19
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
20
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?

पात्रता परीक्षा असताना बारावी बोर्डात ७५% गुण बंधनकारक का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2023 6:35 AM

‘जेईई मेन’बाबत उच्च न्यायालयाची राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाला विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी इत्यादी प्रवेशासाठी पात्रता परीक्षा असतानाही बोर्डांमध्ये ७५ टक्के गुणांचा पात्रता निकष ठेवण्यामागे उद्देश काय, याची माहिती देण्याचे निर्देश  उच्च न्यायालयाने राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाला (एनटीए) गुरुवारी दिले.

पात्रता परीक्षा असताना बारावीत ७५ टक्के गुण मिळविणे बंधनकारक का? त्यामागे उद्देश काय?, असा प्रश्न उच्च प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने ‘एनटीए’ला केला. बारावीत बोर्डाच्या परीक्षेला किमान ७५ टक्के गुणांच्या निकषाला आव्हान देणारी जनहित याचिका  सामाजिक कार्यकर्त्या अनुभा सहाय यांनी दाखल केली आहे. ॲड. रुई रोड्रिग्स यांनी न्यायालयाला सांगितले की, उमेदवाराला बोर्ड परीक्षेत ७५ टक्के गुण हवेत किंवा संबंधित बोर्डाच्या टॉप २० पर्सेंटाइलमध्ये असणे गरजेचे आहे. २०१९ नंतर बोर्डांनी टॉप २० पर्सेंटाइल प्रसिद्ध केलेली नाही. न्यायालयाने २०१९ च्या कटऑफ डेटाचा संदर्भ देत म्हटले की, काही बोर्डांमध्ये टॉप २० पर्सेंटाइलसाठी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण ठेवले आहेत. ही  तुम्ही देऊ केलेली इच्छित सवलत अर्थपूर्ण आहे का? फक्त मोजक्या मंडळांनाच त्याचा फायदा होईल. महाराष्ट्रासाठी कटऑफ सीबीएसईपेक्षाही जास्त आहे, असे न्यायालयाने म्हटले. 

जेईई मेनमध्ये ९२ टक्के, बोर्डात ७२ टक्के

याचिकाकर्त्याने जेईई मेन २०२३ साठी मे महिन्यात आणखी एक सत्र ठेवण्यासाठी अंतरिम अर्जही न्यायालयात दाखल केला आहे. तसेच पात्रता निकषांना आव्हान देणारा हस्तक्षेप अर्जही एका विद्यार्थ्याने दाखल केला आहे. अर्जदाराने जेईई मेनमध्ये ९२ टक्के गुण मिळवले असून जेईई ॲडव्हान्समध्ये बसण्यास पात्र आहे. मात्र, बोर्डाच्या परीक्षेत ७२ टक्के गुण मिळाल्याने पात्र ठरूनही प्रवेश मिळणार नाही, असे याचिकादार विद्यार्थिनीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने परीक्षा प्राधिकरणाला दोन्ही अर्जांवर उत्तर देण्याचे निर्देश दिले.