शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

जागतिक वन दिवस : दिवसेंदिवस घटते आहे कोल्हापूरचे घनदाट जंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 15:32 IST

environment Forestdepartment Kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यातील वनसंपदा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे वनखात्याच्याच आकडेवारीवरून स्पष्ट होत असून, पर्यावरणाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे. आकडेवारीनुसार जिल्ह्यातील वनआच्छादन हे केवळ साडेनऊ टक्के असल्याचे स्पष्ट होत आहे. वनविभागाने २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या सर्वांत अलीकडच्या इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्टमधील नोंदीनुसार जिल्ह्यातील जंगलक्षेत्र हे ९.६८ टक्क्यांनी कमी झाल्याचे दर्शविते.

ठळक मुद्देवनआच्छादन केवळ साडेनऊ टक्के इंडियाज स्टेट फॉरेस्टच्या अहवालातील नोंद

संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील वनसंपदा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे वनखात्याच्याच आकडेवारीवरून स्पष्ट होत असून, पर्यावरणाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे. आकडेवारीनुसार जिल्ह्यातील वनआच्छादन हे केवळ साडेनऊ टक्के असल्याचे स्पष्ट होत आहे. वनविभागाने २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या सर्वांत अलीकडच्या इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्टमधील नोंदीनुसार जिल्ह्यातील जंगलक्षेत्र हे ९.६८ टक्क्यांनी कमी झाल्याचे दर्शविते.कोल्हापूर हे पश्चिम घाटातील महत्त्वाचे जंगलक्षेत्र असून, या परिसरातील जंगलाचे क्षेत्र कमी होणे ही पर्यावरणाची मोठी हानी आहे. त्याबद्दल पर्यावरण तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली असून, ही घट अतिशय गंभीर असल्याचे मतही व्यक्त केले आहे.इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट हा २०१७ ते २०१९ या दोन वर्षांतील पाहणीचा अहवाल आहे. यामध्ये अतिशय घनदाट, मध्यम आणि खुले वनक्षेत्र अशा तीन प्रकारच्या वर्गवारीच्या नोंदी निरीक्षणासाठी घेतल्या आहेत. २०१७ च्या तुलनेत कोल्हापुरातील वनक्षेत्र हे २०१९ च्या डिसेंबरअखेर ९.६८ चौरस किलोमीटर इतके कमी झाल्याचे या अहवालात दिसून येते, तर खुरटे जंगल हे १०२.८३ चौरस किलोमीटर इतके वाढले आहे. हा अहवाल केवळ उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रावरून निश्चित केला आहे.पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने घनदाट जंगल असणे महत्त्वाचे आहे. मात्र, सर्वत्रच हे जंगल कमी होत चालले आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. घनदाट जंगल वाढण्याऐवजी खुरटे जंगल वाढत आहे हे आकडेवारी पाहिल्यास सिद्ध होते.वनसंपदेला मारक असणारी कारणेराखीव जंगलांतही मोठ्या प्रमाणात होणारी चोरटी वृक्षतोड, त्यातील मानवी हस्तक्षेप, संरक्षित जंगलालाही लागणारा वणवा यासारखी अनेक कारणे गंभीर आहेत. जमिनींचे संपादन, प्राण्यांचा नेहमीचा कॉरिडॉर बंद होणे, जंगलांना लागणारा वणवा आणि मनुष्य-वन्यप्राणी संघर्षाचाही परिणाम ही वनसंपदेला मारक असणारी कारणे पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितली आहेत. यासाठी खासगी जंगलावरही वनखात्याचे नियंत्रण आणणे, चोरटी वृक्षतोड थांबविणे, जास्तीत जास्त वनक्षेत्र संरक्षित करणे यासारख्या उपाययोजना कठोरपणे करणे गरजेचे आहे.कोल्हापूर वनवृत्त क्षेत्रवनखात्याच्या ताब्यातील जमीन /वनविकास महामंडळाकडील जमीन /वन्यजीव विभागाकडील जमीन / एकूण वनक्षेत्र

  • कोल्हापूर : १३३५.७१/१५.५६/३९०.३२/१७४१.५९
  • सातारा : ११७३.३६/०/३९४.२७/१५६७.६३
  • सांगली : ४१६.४५/०/११७.२९/५३३.७४
  • सिंधुदुर्ग : ५५६.०१/०/०/५५६.०१
  • रत्नागिरी : ९१.४१/०/४.६२/९६.०३

------------------------------------एकूण : ३५७२.९४/१५.५६/९०६.५/४४९४.५५(आकडेवारी चौ. कि.मी.मध्ये -२०१९-२०२०)-----------------------------अभयारण्यांचे क्षेत्र

  • राधानगरी-दाजीपूर अभयारण्य (३५१.१६ चौ.कि.मी)
  • चांदोली राष्ट्रीय उद्यान (३१७.६७० चौ.कि.मी)
  • कोयना वन्यजीव अभयारण्य (४२३.५५० चौ.कि.मी) 

'कॉन्झर्व्हेशन रिझर्व्ह'चे क्षेत्रकोल्हापूर : विशाळगड (९,३२४), पन्हाळा (७,२९१), गगनबावडा (१०,५४८), आजरा-भुदरगड (२४, ६६३) चंदगड (२२,५२३), सातारा - जोर-जांभळी (६,५११), मायणी पक्षी अभयारण्य (८६६), सिंधुदुर्ग - आंबोली-दोडामार्ग (५६९२).(सह्याद्रीच्या वनक्षेत्रामधील एकूण ८६ हजार ५५४ हेक्टर वनक्षेत्राला संरक्षण मिळाले आहे. कंसातील आकडे हेक्टरमध्ये)कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलाची स्थिती

  • भौगोलिक क्षेत्र : ७६८५
  • एकूण जंगल : १७८६.३२
  • घनदाट जंगल : ६४.००
  • मध्यम जंगल : १०२०.४४
  • खुले जंगल : ७०१.८८
  • खुरटे जंगल : १०२.८३
  • एकूण घट : ०९.६८
  • भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत टक्केवारी : २३.२४

(आकडेवारी चौ. कि.मी.मध्ये -२०१७ ते २०१९)

जंगलक्षेत्र कमी होण्याला मानवी हस्तक्षेपच प्रामुख्याने कारणीभूत आहे. राधानगरीसारख्या अभयारण्याला संरक्षित वनाबाबतची अंतिम अधिसूचना अद्यापही निघालेली नाही, यावरूनच जैवविविधतेच्या बाबतीत सरकार किती गंभीर आहे, हे लक्षात येते. पश्चिम घाटाचा समावेश असलेल्या कोल्हापुरातील पश्चिम भागातील आठ तालुक्यांतील जंगल असेच हळूहळू नष्ट होईल, अशी भीती आहे.- डॉ. मधुकर बाचूळकर,पर्यावरण तज्ज्ञ.

टॅग्स :environmentपर्यावरणforest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर