शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

'तो' पुन्हा येणार? सुरुवात नदी, तलावांपासून होणार; नव्या रिपोर्टनं सगळेच हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 09:52 IST

जागतिक तापमान पर्मियन काळाच्या बरोबरीस पोहचले आहे. जगातील अनेक नदी, तलावात घातक जीवाणू आणि विषारी शेवाळं यांचे प्रमाण वाढत आहे

सिडनी - मागील ४०० कोटी वर्षांत पृथ्वीवर अनेकदा प्रलय आलेला आहे. निसर्गाने अनेकदा प्रकोप दाखवत मोठ्या प्रमाणात जीवहानी केली आहे. आता पुढील प्रलयाची सुरूवात झाली आहे. जगातील नदी, तलावांपासून याचा प्रारंभ झाला आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंग आणि जलवायू परिवर्तनामुळे घातक जीवाणू आणि विषारी शेवाळ(Toxic Algal Bloom) वेगाने वाढत आहे. पृथ्वीवरील प्रलयासाठी हेच मुख्य कारणीभूत ठरणार आहे. ज्यामुळे अनेक जीवांचा नाश होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

सर्वात धोकादायक प्रलय स्थिती पर्मियन काळाच्या(२३ते२० कोटी वर्षापूर्वीचा काळ) अखेरीस आली होती. त्यावेळी नकारात्मक स्थिती तयार झाली होती जे त्याकाळातील जीवांना घातक ठरली. चहुबाजूने जंगलाला आग, दुष्काळ, समुद्रातील पाणी गरम झाले. धोकादायक जीवाणू, विषारी शेवाळ वाढलं होते. नदी, तलाव आणि अन्य पाण्याचे स्त्रोत जीवघेणे ठरले. ऑक्सिजन संपला होता. जीव मृत्यू पडत होते. अत्यंत कमी जीव या काळात वाचले होते. या काळात पृथ्वीवरील ७० टक्के जीव संपुष्टात आले होते. समुद्रातील ८० टक्के प्रजाती नष्ट झाली होती. सध्या माणूस या सर्व घटनांकडे दुर्लक्ष करत आहे. सातत्याने जीवाश्म इंधने काढत आहे. पृथ्वीच्या ज्या थरांमधून जीवाश्म इंधन बाहेर पडतात त्या थरांवर प्रलयाचे पुरावे सापडत आहेत.

अलीकडेच झालेल्या अनेक स्टडी अहवालात याचा खुलासा झाला आहे की, जागतिक तापमानवाढीची पातळी सातत्याने वाढत आहे जुन्या प्रलयावर रिसर्च करणाऱ्या वैज्ञानिकांच्या टीमचे क्रिस्टोफर फील्डिंग म्हणाले की, जागतिक तापमान पर्मियन काळाच्या बरोबरीस पोहचले आहे. जगातील अनेक नदी, तलावात घातक जीवाणू आणि विषारी शेवाळं यांचे प्रमाण वाढत आहे. अशास्थितीत पर्मियन काळासारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. एक प्रजाती संपली तर त्याचा परिणाम दुसऱ्यावर पडणार आहे. त्यामुळे पृथ्वीवरील पर्यावरणीय संतुलन बिघडेल आणि प्रलयाची सुरुवात होईल. 

सध्याची स्थिती काय? जाणून तुम्हीही हैराण व्हालज्यारितीने तापमानात वाढ होत आहे. जंगलात आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होतेय. २०१९ आणि २०२० मध्ये ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीचं सर्वात मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे. ज्यात कोट्यवधी जीव मृत्युमुखी पडले. कॅलिफोर्नियापासून युरोपपर्यंत, रशियाच्या आर्कटिकपासून भारताच्या उत्तराखंडपर्यंत प्रत्येक ठिकाणी तापमान वाढीमुळे जगंलात आगीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे जंगलात राहणाऱ्या जीवांसाठी जीवघेणी स्थिती आहे. 

पुढील प्रलय कधी येईल याबाबत वैज्ञानिकांनी सांगितले नाही परंतु महत्त्वाचं म्हणजे, या प्रलयाची सुरुवात झाली आहे. कार्बन डायऑक्साइड वाढल्याने तापमानात वाढ होत आहे. रोग पसरणे, जंगलाला आग लागणे, समुद्रातील पाण्याची पातळी वाढणे या घटना घडत आहेत. परंतु त्याची सुरुवात नदी आणि तलावापासून होत आहे. जेव्हा आपले पाण्याचे स्त्रोत ऑक्सिजन विरहित होतील तेव्हा जीव नष्ट होतील, झाडे मृत होतील. हीच परिस्थिती पृथ्वीवरील सर्व जीवांच्या मृत्यूचं कारण बनेल.