शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

१७५ प्रजातींच्या फुलपाखरांचा विहार; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत आहे मुक्त संचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 07:42 IST

फुलपाखरांची ठिकाणे विखुरलेल्या स्वरुपात असून, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसारख्या काँक्रिटच्या जंगलात फुलपाखरांच्या आजही सुमारे १७५ च्या प्रजाती आढळत आहेत.

- सचिन लुंगसेमुंबई : मनुष्य प्राण्याने निसर्गावर केलेले अतिक्रमण, नष्ट केलेली जंगले, वाढत असलेले शहरीकरण अशा अनेक घटकांमुळे जैवविविधता नष्ट होत असली तरी दुसरीकडे निसर्ग वाचविण्यासाठी मोठया चळवळी उभ्या राहत आहेत.याच चळवळींचे फलित म्हणून आरेसारखी हिरवळ टिकून असून, या हिरवळतली फुलपाखरे आजही तग धरून आहेत. फुलपाखरांची ठिकाणे विखुरलेल्या स्वरुपात असून, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसारख्या काँक्रिटच्या जंगलात फुलपाखरांच्या आजही सुमारे १७५ च्या प्रजाती आढळत आहेत.हा आकडा ठोस नसून, तो वर खाली असू शकतो, असे फुलपाखरु अभ्यासकांचे म्हणणे आहे. आणि वाढते शहरीकरण हा फुलपाखरांसाठी वाढता धोका असल्याची निसर्ग अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.फुलपाखरांच्या ठिकाणांचा विचार करता मुंबईत धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यान हे फुलपाखरे पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे प्रत्येक वर्षी फुलपाखरांच्या संवर्धनासाठी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यापासून नागरिकांना फुलपाखरे पाहता यावीत म्हणून उद्यानातल्या उद्यानात फेरीचे आयोजन केले जाते. अभ्यासकांकडून उपस्थितांना फुलपाखराबाबत माहिती दिली जाते. या व्यतीरिक्त उर्वरित कार्यक्रम देखील हाती घेतले जातात. दुसरे ठिकाण म्हणजे मुंबईतले म्हणजे बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे होय. येथे देखील मोठया प्रमाणावर फुलपाखरांच्या प्रजाती आढळत असून, येथे देखील फुलपाखरे पाहण्यासाठी नागरिक दाखल होत असतात.विविध स्तरावर राबवले जातात उपक्रमदेशभरात सप्टेंबर हा महिना फुलपाखरांचा महिना साजरा केला जात असून, देशासह राज्य आणि मुंबईत ठिकठिकाणी फुलपाखरांच्या संवर्धनासाठी विविध स्तरावर उपक्रम राबविले जात आहेत. फुलपाखरांच्या प्रजातींच्या नोंदी करण्यासह प्रश्न-उत्तरे, छायाचित्रण, आॅनलाइन वर्कशॉपसह विविध उपक्रमांचा यात समावेश आहे.नॅशनल पार्कमध्ये वावरधारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यान, बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा ठाणे जिल्ह्यातील काही भाग, ठाण्यामध्येच ओवेकर वाडी बटर फ्लाय गार्डन येथे फुलपाखरे आढळतात. या व्यतिरिक्त मुंबईत ठिकठिकाणीही फुलपाखरे आढळतात. मात्र हे प्रमाण तुलनेने कमी आहे.कोणत्या प्रजातींना जिल्ह्यातकशामुळे धोका आहेमुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतल्या फुलपाखरांच्या संवर्धनाचा विचार करता मुंबईसह लगतच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले आहे. साहजिकच याचा फटका निसर्गाला बसला आहे. आजघडीला विचार करता मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत फुलपाखरांच्या १७५ प्रजाती आढळतात. येथील फुलपाखरांची ठिकाणे ही विखरलेल्या स्वरूपात आहेत. मात्र फुलपाखरांसाठीची फळझाडे, फुलझाडे नामशेष होत असल्याने साहजिकच फुलपाखरांना धोका निर्माण झाला आहे.मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत आहे. याचा फटका साहजिकच निसर्गाला म्हणजे फुलपाखरांना बसत आहे. फुलपाखरांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. फळझाडे, फुलझाडे नामशेष होत आहेत. याचा फटका फुलपाखरांना बसत आहे.- मंदार सांवत,अभ्यासक, संशोधकफुलपाखरांचे संवर्धन व्हावे म्हणून महाराष्ट्र निसर्ग उद्यानात काम सुरू आहे. प्रत्येक वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. नागरिकांसाठी उद्यानात फेरीचे आयोजन केले जाते. याद्वारे नागरिकांना फुलपाखरांचे दर्शन घडविले जाते. माहिती दिली जाते.- युवराज भारत पाटील,सहायक कार्यक्रम अधिकारी, महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था, धारावी

टॅग्स :environmentपर्यावरण