शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राजाराम तलावासभोवती जगवली झाडे, मॉर्निंग वॉकच्या गटाने केली किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 16:46 IST

environment Tree WildLife Kolhapur- वृक्षसंवर्धनाच्या नावाखाली अनेकदा दिखावा केला जातो. मात्र, नियमित फिरण्यासाठी येणाऱ्या विविध समूहातील व्यक्तींनी सातत्याने दोन वर्षांहून अधिक काळ येथील राजाराम तलावाभोवती लावलेल्या रोपांना पाणी घालून जगविले आहे. एकमेकांची ओळखही नसताना केवळ वृक्षसंवर्धनासाठी हा गट आता एक झाला आहे.

ठळक मुद्देराजाराम तलावासभोवती जगवली झाडेमॉर्निंग वॉकच्या गटाने केली किमया

संदीप आडनाईककोल्हापूर : वृक्षसंवर्धनाच्या नावाखाली अनेकदा दिखावा केला जातो. मात्र, नियमित फिरण्यासाठी येणाऱ्या विविध समूहातील व्यक्तींनी सातत्याने दोन वर्षांहून अधिक काळ येथील राजाराम तलावाभोवती लावलेल्या रोपांना पाणी घालून जगविले आहे. एकमेकांची ओळखही नसताना केवळ वृक्षसंवर्धनासाठी हा गट आता एक झाला आहे.कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ, राजाराम तलाव, कृषी कॉलेज परिसरात अनेकजण फिरायला येतात. असे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या कोल्हापुरात कमी नाही; परंतु स्वत:च्या आरोग्यासोबत पर्यावरणाचीही काळजी घ्यावी, असा विचार करणाऱ्यांची संख्याही हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच आहे. अशा पर्यावरणप्रेमींमध्ये प्रत्यक्ष कृती करणारा एक गट सध्या कौतुकास पात्र ठरला आहे.सातत्याने राजाराम तलावावर पोहायला येणाऱ्यांनी पाटबंधारे खात्याच्या दीड किलोमीटर परिसरातील ओसाड जागेत झाडे लावण्याचा निर्णय घेतला आणि दोन वर्षांपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला.

पाच ते सहा जणांपासून आता हा गट सायकलवरून पाच लिटरच्या सुमारे ३० कॅनने रोज सकाळी ६ ते ८ या वेळेत तलावातील पाणी उपसून परिसरात लावलेल्या रोपांना घालण्यास त्यांनी सुरुवात केली. प्रारंभी समीर नरेंद्र मेहता यांनी फिरायला जाताना एकट्याने वाटेवरच्या झाडांना पाणी घालण्यास सुरुवात केली. त्यांना असेच काम करणारे धनंजय वाडकर भेटले. मग विजय शिंदे, दत्ता पवार, सुधाकर कुंभार, मंगेश जनार्दन पाटोळे, विठ्ठल बसप्पा भागोजी आदी पर्यावरणप्रेमी स्वयंस्फूर्तीने त्यांच्या कामात मदत करत गेले.

हाताने पाणी उपसण्यासाठी लागणारी मेहनत पाहून फिरायला येणारे आर्किटेक्चर सूरत जाधव यांनी ट्रेडर पंप देणगी म्हणून दिला. या पंपद्वारे आता साडेतीनशे फूट पाइपच्या साहाय्याने २० फूट अंतरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या झाडांना पाणी देता येऊ लागले.ही झाडे जगवलीपरिसरातील माळावर पूर्वी लावलेली तसेच नव्याने लावलेल्या रोपांना हा गट लॉकडाऊनच्या आधीपासून सातत्याने पाणी घालत आला आहे. मार्च, एप्रिलमध्ये करंजी, रेनट्री, बहावा, रामफळ, लिंबू अशा जंगली झाडांच्या सुमारे पाचशे ते सहाशे बिया जमा करून येथे सुमारे १००० झाडे लावली आहेत. या गटाने परिसरात येणारी जनावरे खाऊ शकणार नाहीत, अशी करंजीची ९० टक्के रोपे जगवून दोन वर्षांत मोठी केली आहेत. 

टॅग्स :environmentपर्यावरणwildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूर