शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

World Biodiversity Day : काटेपूर्णा अभयारण्यात रुजली जैवविविधता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 10:15 IST

World Biodiversity Day : जिल्ह्याच्या एकूणच पर्यावरणात या अभयारण्यातील जैवविविधतेचा मोठा हातभार लागलेला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियल या अभयारण्यात आढळतो. या अभयारण्यात २७ प्रजातींच्या पक्ष्यांचे स्थलांतर होते. अभयारण्यात कोळ््याच्या ९२ प्रजाती आढळतात.

अकोला : पर्यावरणातील घटकांचा दैनंदिन होत असलेला ºहास पाहता अकोला जिल्ह्याच्या पर्यावरणासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यात विविध प्रकारची जैवविविधता रुजली आहे. जैवविविधतेची संपन्नता टिकवून ठेवण्यासाठी अभयारण्यातील मानवी हस्तक्षेप रोखण्यासोबतच पर्यावरणातील घटकांच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज जैवविविधता दिनानिमित्त अधोरेखित होत आहे. अकोला जिल्ह्यातील जंगलाचे प्रमाण पाहता अत्यल्प आहे. त्यातील जैवविविधतेलाही मर्यादा आहेत. या दोन्ही बाबी पाहता काटेपूर्णा अभयारण्य जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या अभयारण्यातील जैवविविधता पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तेवढीच महत्त्वाची आहे. या अभयारण्याचे क्षेत्र कमी असले तरी तेथे विविध जातींचे प्राणी, वनस्पती आहेत. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मध्ये नमूद प्राण्यांच्या नोंदीपैकी सस्तन प्राण्यांच्या २५ प्रजाती आहेत. त्यातील तीन धोकाग्रस्त झाल्या आहेत. त्यामध्ये बिबट, अस्वल, इंडियन पँगोलिनचा समावेश आहे. पक्ष्यांच्या १२३ प्रजाती आहेत.   या अभयारण्यात २७ प्रजातींच्या पक्ष्यांचे स्थलांतर होते. सोबतच महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियल या अभयारण्यात आढळतो. १९ प्रकारचे सरपटणारे प्राणी आहेत. त्यापैकी अजगर व सुसर धोकाग्रस्त आहेत. तर फुलपाखरांच्या ७४ प्रजाती आहेत. त्यातील दोन प्रजाती धोक्यात आहेत. या अभयारण्यात कोळ््याच्या ९२ प्रजाती आढळतात. तर वनस्पती प्रजातींमध्ये मोठी व मध्यम प्रकारची झाडे ५१ आहेत. झुडुपांच्या प्रजाती २३ आहेत. वेलींच्या ८ प्रजाती आहेत. बांबू व गवताच्या १८ प्रजाती आहेत. जिल्ह्याच्या एकूणच पर्यावरणात या अभयारण्यातील जैवविविधतेचा मोठा हातभार लागलेला आहे.

पक्ष्यांसाठी कृत्रिम बेटपक्ष्यांसाठी कृत्रिम बेटांची निर्मिती हा राज्यातील पहिला अभिनव उपक्रम या अभयारण्यात सुरू झाला आहे. काटेपूर्णा अभयारण्यातील जलाशयात पक्ष्यांसाठी या बेटांची निर्मिती करण्यात आली आहे. नदी सुराय व छोटी पाण भिंगरी हे पक्षी या बेटांवर अंडी घालतात.या अभयारण्यालगत शेती असलेल्या अनेकांनी मोठ्या प्रमाणात जमिनीवर अतिक्रमण केले आहे. ते रोखणे आवश्यक आहे. पक्ष्यांची शिकार करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यांना आवर घालणेही आवश्यक आहे. तसेच काटेपूर्णा धरण परिसरातून चोरटी मासेमारी करणाऱ्यांमुळेही जैवविविधतेतील अनेक घटकांच्या दैनंदिन वास्तव्यात व्यत्यय निर्माण केला जात आहे.अभयारण्यातील जैवविविधता वाढविण्यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्न केले. पक्ष्यांची संख्या वाढण्यासाठी नऊ कृत्रिम बेटे तयार केली. त्यामुळे पक्ष्यांची संख्या वाढली. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी नाकेबंदी, चेकनाके तयार केले. परिणामी चितळची, नीलगायींची संख्या वाढली. एकूणच जैवविविधतेला हातभार लागला आहे.- मनोजकुमार खैरनार, विभागीय वनाधिकारी, वन्यजीव, अकोला.

जिल्ह्याच्या पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या अभयारण्याचेसंरक्षण आणि संवर्धन करणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यावरण टिकेल तरच मानवी जीवन सुरक्षित आहे, हेही सर्वांनी ध्यानात घ्यायला हवे.- अमोल सावंत, संस्थापक, निसर्गकट्टा.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Forestकाटेपूर्णा अभयारण्यwildlifeवन्यजीव