शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
2
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
3
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
4
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
5
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
6
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
7
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
8
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
9
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
10
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
11
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
12
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
13
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
14
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
15
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
16
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
17
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
18
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
19
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
20
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादम्यान भारत आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये वाद? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:28 IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान, भारत-बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचा दावा

Claim Review : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान, भारत-बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये वाद झाल्याचा दावा
Claimed By : Social Media User
Fact Check : चूक

Created By: BOOMTranslated By: ऑनलाइन लोकमत

Fact Check: चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान २० फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत-बांगलादेश सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी भिडल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून केला जात आहे.

व्हायरल व्हिडिओबाबत करण्यात येत असलेला दावा खोटा असल्याचे बूमच्या तपासात आढळून आला आहे. व्हायरल व्हिडिओ अंडर-१९ विश्वचषक २०२० चा आहे. अंतिम सामन्यात बांगलादेशच्या विजयानंतर खेळाडूंमधील जोरदार वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आयोजन १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि युएईद्वारे केले गेलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी अंतर्गत भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. भारताने हा सामना सहा विकेटने जिंकला.

एका फेसबुक यूजरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये भारत आणि बांगलादेश संघाचे खेळाडू एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत. खेळाडूंमधील हाणामारीचा हा व्हिडिओ २० फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या भारत-बांगलादेश क्रिकेट सामन्यातील असल्याचा दावा या व्हायरल व्हिडीओसोबत केला आहे.

अर्काईव्ह लिंक

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरही व्हायरल झाला आहे.

अर्काईव्ह लिंक

फॅक्ट चेक

व्हायरल व्हिडिओ तपासण्यासाठी, व्हिडिओच्या फ्रेफला गुगलवर रिव्हर्स इमेजमध्ये सर्च केले. या सर्चदरम्यान व्हायरल व्हिडिओशी संबंधित बातम्या  सापडल्या.

माध्यमांच्या वृत्तानुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अंडर-१९ वर्ल्ड कप २०२० च्या अंतिम सामन्याचा आहे.

१० फेब्रुवारी २०२० च्या नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, ९ फेब्रुवारी रोजी भारत आणि बांगलादेश यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने भारताचा ३ गडी राखून पराभव करत पहिल्यांदाच आयसीसी अंडर-१९ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. व्हायरल व्हिडिओ देखील नवभारत टाइम्सच्या बातमीत एम्बेड करण्यात आला आहे.

वृत्तानुसार, बांगलादेशच्या संघाने विजयी धावा काढताच बांगलादेशचे खेळाडू खूप उत्साहित झाले आणि मैदानावर धावत सुटले.

अमर उजालाच्या बातमीनुसार, विजयानंतर बांगलादेशच्या खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंशी गैरवर्तन केले. बांगलादेशच्या एका खेळाडूने भारतीय संघाच्या खेळाडूसमोर उभं राहून प्रक्षोभक वक्तव्य करण्यास सुरुवात केली. वातावरण तापत असल्याचे पाहून अंपायरने हस्तक्षेप केला.

यूट्यूबवर यासंदर्भातील कीवर्ड सर्च केले असता ९ फेब्रुवारी २०२० रोजी डी-क्रिकेट चॅनेलवर अपलोड केलेल्या खेळाडूंमधील भांडणाच्या घटनेचा हा व्हिडिओ सापडला.

या घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बांगलादेशच्या अंडर-१९ क्रिकेट संघाचा कर्णधार अकबर अलीनेही खेद व्यक्त केला होता. "आमचे काही गोलंदाज भावूक आणि अधिकच उत्साहित झाले होते. सामन्यानंतर जे घडले ते दुर्दैवी आहे, असे घडायला नको होते," असं त्याने म्हटलं.

या संपूर्ण घटनेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कारवाई केली. हिंदुस्थानच्या वृत्तानुसार, आयसीसीने ५ खेळाडूंना (२ भारतीय आणि ३ बांगलादेशी) आचारसंहितेच्या तिसऱ्या स्तराचे उल्लंघन केल्याबद्दल फटकारले आणि त्यांच्या खात्यांमध्ये डी-मेरिट गुण जोडले.

यासंदर्भात सध्या चालू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे कव्हरेज करत असलेल्या क्रिकेट पत्रकार विमल कुमार यांच्याशी संवाद साधला. २० फेब्रुवारी रोजी झालेल्या भारत-बांगलादेश सामन्यात खेळाडूंमध्ये वाद झाल्याची कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी सांगितले.

(सदर फॅक्ट चेक BOOM या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.) 

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघBangladeshबांगलादेशSocial Viralसोशल व्हायरल