शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

​विवाह प्रमाणपत्र कसे मिळवाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2016 3:05 PM

हिंदू विवाह संस्थेत, विवाहाला विशेष महत्त्व आहे. परंपरेनुसार विवाह हा आयुष्यातील अतिशय महत्तवाचा व परिवर्तनीय टप्पा आहे

रवींद्र मोरे हिंदू विवाह संस्थेत, विवाहाला विशेष महत्त्व आहे. परंपरेनुसार विवाह हा आयुष्यातील अतिशय महत्तवाचा व परिवर्तनीय टप्पा आहे. संस्कारांचा किंवा आयुष्यक्रमाचा अतिमहत्त्वाचा भाग मानला गेला आहे. परंतु बदलत्या काळात या संस्काराला कादेशीर वैधताही आवश्यक झाली आहे. यासाठी विवाह प्रमाणपत्र फारच आवश्यक आहे. हे विवाह प्रमाणपत्र कसे मिळवायचे याबाबत आज आपण जाणून घेऊ...कायदेशीर तरतुद विवाह प्रमाणपत्र हा विवाहाचा महत्त्वाचा पुरावा असतो. पासपोर्ट मिळविणे तसेच गोत्रात बदल करण्यासाठी आपला विवाह कोणासोबत कायदेशीर पद्धतीने झाला आहे, हे स्पष्ट करण्यासाठी विवाह प्रमाणपत्राची आवश्यकता भासते. भारतात दोन विवाह अधिनियमांपैकी एक अधिनियमानुसार नोंदणी करता येऊ  शकते. हिंदू विवाह अधिनियम, १९५५ किंवा विशेष विवाह अधिनियम, १९५४. विवाहास पात्र होण्यासाठी पुरुषाचे किमान वय २१ वर्ष आणि महिलेचे १८ वर्ष असावे. हिंदू विवाहामध्ये दोन्ही पक्ष अविवाहित किंवा घटस्पोटीत असावे किंवा अगोदर विवाह झाले असेल तर विवाहाच्यावेळी आधीची पत्नी किंवा पती जिवंत नसावे. शिवाय दोन्ही पक्ष शारीरिक आणि मानसिक सुदृढ असावेत. त्यांची स्थिती कायद्यांच्या तरतुदीला अनुसरुन असावी. विशेष विवाह अधिनियम विवाह अधिकारीतर्फे विवाह पार पाडणे आणि नोंदणी करणे आदी व्यवस्था केली जाते. हिंदू विवाह अधिनियम फक्त हिंदुंसाठी लागू आहे, आणि विशेष अधिनियम भारतातील सर्व नागरिकांसाठी लागू आहे. हिंदू विवाह अधिनियम अगोदर झालेल्या विवाहाच्या नोंदणीची व्यवस्था करते. यात नोंदणीतर्फे विवाह पार पाडण्याची व्यवस्था नाही. विशेष अधिनियमात विवाह अधिकाºयाद्वारा विवाह पार पाडणे आणि नोंदणी करण्याची व्यवस्था केली जाते. हिन्दू विवाह अधिनियमनूसार ज्यांच्या क्षेत्राधिकारांत विवाह संपन्न केला जातो त्या नोंदणीकाराकडे पक्षकारांना अर्ज करता येतो. दोन्ही पक्षकारांना नोंदणीकाराकडे विवाहाच्या एका महिन्याच्या आत आपले आई-वडील किंवा नातेवाईक किंवा पंचांसोबत उपस्थित राहायचे असते. पाच वर्षापर्यंत माफीची व्यवस्था नोंदणीकाराद्वारे आणि त्यानंतर जिल्हा रजिस्टाराद्वारे केली जाते. विशेष विवाह अधिनियमनुसार प्रयोजनार्थ विवाहाचे पक्ष ज्या विवाह अधिकारीच्या क्षेत्राधिकारात येतात, सूचनेच्या तारखेच्या अगोदर ३० दिवसांपर्यंत किमान एका पक्षकाराला त्यांच्या क्षेत्राधिकारात रहावे लागते. याबाबत त्यांच्या कार्यालयात सुस्पष्ट जागेवर लिहिलेले असावे. जर एक पक्ष दुसºया विवाह अधिकाºयाच्या क्षेत्रात राहत असेल तर याबाबतच्या प्रकाशनासाठी त्या सूचनांच्या प्रती त्याच्याजवळ पाठवाव्यात. हिंदू विवाह कायदाहिंदू कोड बिल (हिंदू कायद्यांचा मसुदा)च्या अंतर्गत १९५५ साली हिंदू विवाह कायदा स्थापित झाला. याच कालावधीत महत्त्वाच्या ३ इतर कायद्यांचीही निर्मिती झाली. ते ३ कायदे म्हणजे - हिंदू वारसाहक्क कायदा (१९५६), हिंदू अल्पसंख्यांक आणि पालकत्व कायदा (१९५६), हिंदू दत्तकविधान आणि निर्वाह कायदा (१९५६). उद्देशहिंदू कोड बिल (हिंदू कायद्यांचा मसुदा)च्या अंतर्गत हिंदू विवाह कायदा संसदेमध्ये १९५५ मध्ये आणला गेला. याचा उद्देश हिंदू लोकांचे वयक्तिक आयुष्य, विशेषत: समाजातील लग्न व्यवस्था, त्याची कायदेशीर वैधता, अवैधातेच्या अटी आणि व्यवहार्यता यांना नियमाच्या चौकटीत बसवणे आणि कायद्यात तरतूद करून देणे हा आहे.हा कायदा कोणाला लागू पडतो?हा कायदा भारतीय राज्यघटनेच्या ४४ व्या कलमानुसार, जैन, बुद्ध, शीख ह्या हिंदू धमार्तून जन्मलेल्या आधुनिक जाती शाखांना लागू आहे.