शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

OMG : ​मोबाइल रिचार्ज करणेही होणार कठीण !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2017 11:03 AM

आपला मोबाइल सहज रिचार्ज होऊ शकणार नाही. यासाठी सरकार एका नव्या योजनेवर काम करीत आहे. या योजननुसार सीम कार्ड रिचार्ज करणाºयाला आपली ओळख दाखवावी लागणार आहे.

मोबाइल रिचार्ज करायचा असेल तर सहज कुठेही आपण रिचार्ज करू शकतो. मात्र यापुढे आता आपला मोबाइल सहज रिचार्ज होऊ शकणार नाही. यासाठी सरकार एका नव्या योजनेवर काम करीत आहे. या योजननुसार सीम कार्ड रिचार्ज करणाºयाला आपली ओळख दाखवावी लागणार आहे. सरकारच्या या योजनेचा खुलासा सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान झाला. मात्र सरकार या योजनेला लगेचच लागू करण्याचा सध्या विचार करत नाही. अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की सरकार आधार कार्डशी जोडलेल्या केवायसीसारख्या प्रोजेक्टला लगेचच पुढे नेऊ शकत नाही. रोहतगी म्हणाले, यासाठी आर्थिक व्यवहारातही पारदर्शकता आणायला हवी. सरकार सर्व मोबाइल फोन ग्राहकांसाठी आधारशी जुळलेल्या केवायसीच्या तयारीत आहे, असेही ते म्हणाले. मात्र या प्रक्रियेला वेळ लागेल. जर ही अट लगेचच सक्तीने लागू केली तर याने खूपच लोक प्रभावित होतील आणि ही प्रक्रिया बॅँकिंग आणि मॉनिटरी ट्रांजेक्शनलाही प्रभावित करु शकते. असेदेखील ते म्हणाले. यावर मुख्य न्यायाधीशांनी असे सांगितले की, सरकारने सर्व प्रीपेड ग्राहकांना एक फॉर्म द्यायला हवा, जेणेकरुन जो कोणी कार्ड रिचार्ज करण्यासाठी येईल त्याला तो फॉर्म भरावा लागेल.