शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

SURVEY : ​लग्नाबाबत भारतीय तरुणाईची काय आहे पसंती !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2017 7:41 AM

लग्नाअगोदर सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली असते. लग्न करण्याअगोदर विविध प्रकारचे विचार मनात घोंगवत असतात.

-Ravindra More‘शादी के लड्डू, जो खाए पछताए, और जो न खाए ओ भी पछताए !’ असे म्हटले जाते. लग्नाअगोदर सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली असते. लग्न करण्याअगोदर विविध प्रकारचे विचार मनात घोंगवत असतात. चला मग भारतीय तरुणाई लग्नाबाबत काय विचार करते, याचा खुलासा एका सर्वेक्षणात झाला असून याबाबत आज जाणून घेऊया. अविवाहित तरुण-तरुणींचे लग्नाबाबतचे विचार जाणून घेण्यासाठी एका वेबसाईटने नुकताच एक सर्व्हे केला. त्यात लग्नामुळे आयुष्यात भावनात्मक आणि आर्थिक स्थैर्य येईल, असं बहुतांश तरुणाईला वाटतं. या आॅनलाईन सर्वेक्षणात २५ ते ३२ वर्षांदरम्यानच्या १४,७०० जणांनी सहभाग घेतला होता. यात ४७ टक्के तरुणी आणि ५३ टक्के तरुणांचा सहभाग होता. त्यात सुमारे २०.५ टक्के तरुण आणि २३.१ टक्के तरुणींनी सांगितलं की, ‘ते लग्नासाठी आणखी वाट पाहू शकत नाहीत.’ तर १२.२ टक्के तरुण आणि १०.३ टक्के तरुण म्हणाले की, ‘आमचा जन्म लग्नासाठी झालेला नाही आणि आम्हाला लग्नात रस नाही.’ याशिवाय १८.२ टक्के तरुण आणि १३.२ टक्के तरुणी द्विधा मनस्थितीत आहेत. लग्न करण्याबाबत त्यांचा ठोस निर्णय झालेला नाही.लग्नासाठी आमचा जन्म झालेला नाही, असं सांगणाऱ्या तरुण आणि तरुणींना याचं कारण विचारलं असता. ३५.१टक्के तरुण आणि २७.२ टक्के मुलींनी सांगितलं की, ‘त्यांना जबाबदारी स्वीकारायची नाही.’ तर ‘आमचा लग्नावर विश्वास नाही,’ असं २३.२ टक्के मुलं आणि २१.३ टक्के मुलींनी सांगितलं.सुमारे २६.३ टक्के मुलं आणि २०.३ तरुणी म्हणतात की, ‘दीर्घ काळासाठी संसारात अडकून राहायचं नाही.’ तर ‘लग्नानंतर आयुष्यात होणाºया बदलाची भीती वाटते,’ असं १५.४ टक्के पुरुष आणि ३१.२ टक्के महिलांनी सांगितलं.लग्नानंतरचा सर्वात मोठा फायदा काय?, असं विचारलं असता २५.७ टक्के पुरुष आणि ३४.७ टक्के महिलांनी त्याचं उत्तर भावनात्मक आधार हे दिलं. आयुष्यभराचा साथीदार मिळणं हा लग्नाचा सर्वात मोठा फायदा असल्याचं ३३.७ टक्के पुरुष आणि ४५.२ टक्के महिलांनी सांगितलं.