TECH KNOW : ...म्हणून खराब होते स्मार्टफोनची बॅटरी !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2017 6:46 AM
सातत्याने स्मार्टफोनचा वापर होत असल्याने त्याची बॅटरीही लवकर डिस्चार्ज होते, या शिवाय असे अनेक कारणे आहेत ज्यामुळे बॅटरी खराब होण्यास मदत होते. जाणून घेऊया कोणती कारणे आहेत बॅटरी ख़राब होण्याची...
आज प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर करीत असून जणू प्रत्येकाच्या जीवनाचा तो अविभाज्य घटकच बनला आहे. त्यातच सातत्याने स्मार्टफोनचा वापर होत असल्याने त्याची बॅटरीही लवकर डिस्चार्ज होण्याची समस्या भेडसावते. त्यामुळे फोनला वारंवार चार्जही करावा लागतो. आपणासही जर असा अनुभव येत असेल तर आम्ही आपणास अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला वारंवार बॅटरी चार्ज करण्याची गरज पडणार नाही.बऱ्याचदा आपण आपल्या फोनला रात्रभर चार्जिंगसाठी ठेवतो आणि सकाळी उठल्यानंतर चार्जिंग बंद करतो. पण असे करणे चुकीचे आहे. यामुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर खराब होते. याशिवाय असे अनेक कारणे आहेत ज्यामुळे बॅटरी खराब होण्यास मदत होते. सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी मोबाइल पूर्णपणे चार्ज असावा यासाठी अनेकजण रात्री फोन चार्जिंगसाठी लावतात आणि सकाळी बंद करतात. पण रात्रभर चार्जिंग केल्याने फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या फोनची बॅटरी लवकर खराब होते तसेच फोनही हँग होण्यास सुरुवात होते.आपण ज्या स्मार्टफोन्सचा वापर करतो त्याची बॅटरी ‘Lithium-Ions’ ची बनलेली असते. गरजेपेक्षा जास्त चार्ज असल्यास बॅटरीवर परिणाम होतो. अँड्रॉइड आणि आयफोन्समध्ये एक खास प्रकारची चिप बसविण्यात आलेली असते. ही चीप फोन चार्ज झाल्यानंतर येणाऱ्या विद्युत प्रवाहाला थांविण्याचे काम करते. म्हणजेच जर तुम्ही तुमचा फोन ओरिजनल चार्जरने चार्ज कराल तर तुमची बॅटरी लवकर खराब होणार नाही.