'या' एका अटीमुळे झाला ऐश्वर्या-सलमानचा ब्रेकअप; बऱ्याच वर्षांनी कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 05:58 PM2022-05-31T17:58:52+5:302022-05-31T17:59:21+5:30

Salman khan: आजवर सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. मात्र, त्याची आणि ऐश्वर्या रायची लव्हस्टोरी विसरणं कोणालाही शक्य नाही.

aishwarya rai put this demand before salman khan thats why they broke up | 'या' एका अटीमुळे झाला ऐश्वर्या-सलमानचा ब्रेकअप; बऱ्याच वर्षांनी कारण आलं समोर

'या' एका अटीमुळे झाला ऐश्वर्या-सलमानचा ब्रेकअप; बऱ्याच वर्षांनी कारण आलं समोर

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचे चित्रपट जसे बॉक्स ऑफिसवर गाजतात. तशीच त्याची पर्सनल लाइफदेखील सोशल मीडियावर चर्चेत येत असते. यात खासकरुन त्याच्या लग्नाचा मुद्दा तर कित्येकदा चर्चिला गेला आहे. वयाची ५० पार केलेल्या सलमानने अद्याप लग्न का केलं नाही इथपासून ते त्याच्या अफअर्सपर्यंत प्रत्येक गोष्ट नेटकरी चवीने वाचत असतात. आजवर सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. मात्र, त्याची आणि ऐश्वर्या रायची (Aishwarya Rai) लव्हस्टोरी विसरणं कोणालाही शक्य नाही. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी ही जोडी विभक्त कशी झाली याविषयी अनेक कारणं पुढे आली. त्यातच सध्या असंच एक कारण समोर आलं आहे. त्यानुसार, ऐश्वर्याने सलमानसमोर एक अट ठेवली होती. ही अट सलमानने मान्य न केल्यामुळे त्यांचा ब्रेकअप झाला.

1999 साली प्रदर्शित झालेल्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटादरम्यान, सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील जवळीकता वाढली होती. याच काळात ते एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक ठिकाणी या दोघांना एकत्रही स्पॉट करण्यात आलं होतं. मात्र, काही महिन्यांमध्येच त्यांच्या नात्यात कुरबूर सुरु झाल्याची माहिती समोर येऊ लागली. इतकंच नाही तर अनेकदा या दोघांचा पब्लिक प्लेसमध्येही वाद झाला होता. त्यामुळे या दोघांनी ब्रेकअप केल्याचं म्हटलं जातं. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, या ब्रेकअपचं कारण वेगळंच आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानला ऐश्वर्यासोबत लग्न करुन सेटल व्हायचं होतं. मात्र, ऐश्वर्याने त्याच्यासमोर दोन अटी ठेवल्या होत्या. सलमान, कायम सोहेल आणि अरबाज यांना आर्थिक मदत करायचा. त्यांच्या चित्रपटांसाठी तो पैसे पुरवायचा. परंतु, हे ऐश्वर्याला मान्य नव्हतं. तसंच तिला लग्नानंतर स्वतंत्र राहायचं होतं. पण, सलमानला त्याच्या कुटुंबासोबतच राहायचं होतं. दोघांमधील याच मतभेदांमुळे त्यांचा ब्रेकअप झाल्याचं सांगण्यात येतं.
 

Web Title: aishwarya rai put this demand before salman khan thats why they broke up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.