मध्यरात्री ऐश्वर्या रायच्या घरी सलमान खाननं घातला होता गोंधळ, बोलवावं लागलं होतं पोलिसांना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 02:12 PM2023-11-01T14:12:11+5:302023-11-01T14:12:53+5:30

माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय १ नोव्हेंबर रोजी तिचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे.

At midnight, Salman Khan created a ruckus at Aishwarya Rai's house, the police had to be called | मध्यरात्री ऐश्वर्या रायच्या घरी सलमान खाननं घातला होता गोंधळ, बोलवावं लागलं होतं पोलिसांना

मध्यरात्री ऐश्वर्या रायच्या घरी सलमान खाननं घातला होता गोंधळ, बोलवावं लागलं होतं पोलिसांना

माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) १ नोव्हेंबर रोजी तिचा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. आजही तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा आहेत. ९वी पासून मॉडेलिंग करणारी आणि १९९३ मध्ये आमिर खानसोबत पेप्सीची जाहिरात करून ओळख मिळवणारी ऐश्वर्या राय तिच्या अभिनय आणि सौंदर्यापेक्षा सलमान खानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल जास्त चर्चेत आहे. दोघांचे ब्रेकअप खूप वेदनादायी होते. 

रिपोर्ट्सनुसार, ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा झाली होती. याच दरम्यान दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपची कटुता त्यांच्या नात्यात आजही कायम आहे. त्यावेळी ऐश्वर्याने सलमानवर मारहाणीचा आरोपही केला होता. एवढेच नाही तर सलमान खानने एका रात्री ऐश्वर्याच्या घरी जाऊन चांगलाच गोंधळ घातला. रिपोर्ट्सनुसार, सलमानला ऐश्वर्यासोबत लग्न करायचे होते. ऐशने त्याला नकार दिल्यावर सल्लू भाई संतापला. २००१ मध्ये एके दिवशी तो ऐश्वर्या रायच्या घरी पोहोचला आणि चांगलाच गोंधळ घातला.

सलमान खानने ऐश्वर्या रायच्या घरी घातला गोंधळ 
ऐश्वर्या रायचे घर अकराव्या मजल्यावर होते. सलमान रागाच्या भरात त्याच्या घरी पोहोचला आणि दरवाजा जोरात वाजवू लागला. सलमान इमारतीवरून उडी मारण्याची धमकी देत ​​असल्याचे शेजारी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले. रात्री सुरू झालेला हा गोंधळ पहाटे तीनपर्यंत सुरू होता. सलमान दरवाजा वाजवत राहिला आणि त्याच्या हातातून रक्त येत होते. सलमानच्या या कृतीमुळे ऐश्वर्याचे वडील कृष्णराज राय संतापले आणि त्यांनी पोलिसात तक्रार केली. त्यावेळी मुंबईचे एएसपी अंबादास पोटे होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, ऐश्वर्या रायच्या वडिलांनी २७ डिसेंबरला सलमानवर नॉन क्रिमिलेअर केस दाखल केली होती. त्याच्या म्हणण्यानुसार, सलमान जेव्हा गोंधळ घालत होता तेव्हा ऐश्वर्या घरी नव्हती.

फोनवर उत्तर न मिळाल्याने सलमान गेला घरी 
एका मुलाखतीत याचा संदर्भ देत सलमानचे वडील सलीम खान म्हणाले होते की, ''सलमान ऐश्वर्या रायला सतत फोन करत होता पण तिने फोन उचलला नाही तेव्हा सलमानला तिची काळजी वाटली. तो तिला भेटण्यासाठी ऐश्वर्याच्या घरी पोहोचला. दरवाजा न उघडल्यामुळे त्याने गोंधळ घातला.'' मात्र, यो गोष्टीला बरेच दिवस उलटून गेलेत. आता ऐश्वर्या रायचे लग्न अभिषेक बच्चनसोबत झाले असून त्यांना एक मुलगीही आहे. 

Web Title: At midnight, Salman Khan created a ruckus at Aishwarya Rai's house, the police had to be called

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.