नताशा आधी हार्दिक पांड्याने 'या' अभिनेत्रींना केलंय डेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 01:18 PM2024-05-30T13:18:34+5:302024-05-30T13:19:10+5:30

 क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आले आहे.

Hardik Pandya dated these actresses before marriage | नताशा आधी हार्दिक पांड्याने 'या' अभिनेत्रींना केलंय डेट

नताशा आधी हार्दिक पांड्याने 'या' अभिनेत्रींना केलंय डेट

Hardik Pandya-Natasa Stankovic :  क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आले आहे. पत्नी नताशा हिच्यासोबत लवकरच हार्दिक पांड्या हा घटस्फोट घेऊ शकतो, असे सांगितले जातंय. हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा वाद टोकाला गेल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. मात्र, यावर हार्दिक पांड्या किंवा नताशा यांच्यापैकी कोणीच भाष्य केले नाहीये. हार्दिक आणि नताशाचे 2020 मध्ये लग्न झालं, पण नताशा आधी क्रिकेटरने अनेक अभिनेत्रींना डेट केले होते. याबद्दल तुम्हाला माहित आहे काय?

हार्दिक पांड्याने कोलकाता मॉडेल लीशा शर्माला डेट केलं होतं.  मात्र, ते दोघे 2017 मध्ये वेगळे झाले. यानंतर क्रिकेटर 'बिग बॉस 7' फेम एली अवरामला डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. डिसेंबर 2017 मध्ये हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याच्या लग्नात एली देखील सहभागी झाली होती. तथापि, 2018 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. एलीनंतर हार्दिक हा अभिनेत्री ईशा गुप्ता हिला डेट करत असल्याचं बोललं जातं होतं. पण, दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची सार्वजनिकरित्या पुष्टी केली नाही.

याशिवाय हार्दिकचे नाव उर्वशी रौतेलाशीही जोडले गेलं होतं.  यानंतर हार्दिकच्या आयुष्यात नताशा आली. दोघांची पहिली ओळख एका नाईट क्लबमध्ये झाली होती. यानंतर दोघांमध्ये प्रेम फुलत गेलं. वर्ष 2020 च्या न्यू ईयर पार्टीत हार्दिकनं नताशाला अनोख्या अंदाजात प्रपोज केलं होतं. यानंतर 2020 च्या लॉकडाऊनमध्ये हार्दिक आणि नताशानं लग्न केलं. हेच नाही तर हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा एक मुलगा देखील आहे. अगस्त्य पांड्या असं त्याचं नाव आहे.  2023 मध्ये या जोडप्याचा भव्य भारतीय आणि ख्रिश्चन विवाह झाला होता. 
 

Web Title: Hardik Pandya dated these actresses before marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.