"आम्हाला एकत्र राहायचं होतं, पण...", अखेर किरण रावने सांगितलं आमिर खानपासून वेगळं होण्याचं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 11:47 AM2024-02-14T11:47:08+5:302024-02-14T11:47:33+5:30

"नवरा-बायको म्हणून आम्हाला...", किरण रावने सांगितलं घटस्फोटामागचं कारण

kiran rao revealed the reason of seperating from aamir khan said we want to redefine our relationship | "आम्हाला एकत्र राहायचं होतं, पण...", अखेर किरण रावने सांगितलं आमिर खानपासून वेगळं होण्याचं खरं कारण

"आम्हाला एकत्र राहायचं होतं, पण...", अखेर किरण रावने सांगितलं आमिर खानपासून वेगळं होण्याचं खरं कारण

बॉलिवूडमधील सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण रावही त्यांच्या नात्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. आयराच्या लग्नात आमिर त्याच्या दोन्ही एक्स पत्नींबरोबर दिसून आला. सर्वांसमोर त्याने किरण रावला किसही केलं होतं. शिवाय आजही किरण राव आमिर खानच्याच बिल्डिंगमध्ये राहत असल्याचं तिने सांगितलं होतं. 

आमिर आणि किरणने २००५मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. त्यानंतर १६ वर्षांच्या संसारानंतर २०२१मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांनी अचानक घेतलेल्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे चाहत्यांनाही धक्का बसला होता. आमिर आणि किरणने नक्की घटस्फोट का घेतला? याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, त्याचं नेमकं कारण समोर आलं नव्हतं. आता किरण रावनेच याचा खुलासा केला आहे. किरण राव तिच्या आगामी लापता लेडीज या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत तिने आमिरबरोबर घटस्फोट घेण्याचं कारण सांगितलं आहे. 

किरण राव म्हणाली, "आमचं नातं हे लग्नापेक्षा जास्त आहे. आम्ही एकत्र काम करायला लागल्यापासूनच आम्ही एकमेकांना ओळखायला लागलो होतो. त्यानंतर आम्ही पार्टनर झालो आणि एकत्र काम करायला लागलो. एखाद्या लग्नातील बंधनातील नात्यापेक्षाही आम्ही एकमेकांना जास्त ओळखतो. आम्हाला कुटुंब म्हणून एकत्र राहायचं होतं. पण, एकमेकांचे नवरा-बायको म्हणून नाही.  त्यामुळे आम्ही स्वत:चे नियम बनवले. नात्यांना सोशल टॅग दिले जाऊ शकत नाहीत, असं मला वाटतं. पण, घटस्फोट घेत वेगळ्या झालेल्या व्यक्ती एकत्र काम करतात, एकाच बिल्डिंगमध्ये राहतात आणि एकत्र जेवतातही या गोष्टी लोकांना सामान्य वाटत नाहीत. घटस्फोटानंतर आमचं नातं संपलं असतं तर मला खूप वाईट वाटलं असतं." 

कधीही भांडण किंवा वाद झालं नसल्याचंही किरण रावने यावेळी सांगितलं. आमिर आणि तिला त्यांचं नातं नव्याने सुरू करायचं होतं, असंही किरण म्हणाली. रिना दत्ताशी घटस्फोट घेतल्यानंतर आमिरने किरणशी लग्न केलं होतं. त्यांना एक मुलगाही आहे. 
 

Web Title: kiran rao revealed the reason of seperating from aamir khan said we want to redefine our relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.