जेव्हा ऋषी कपूर यांच्या लग्नात मोडलेला हात घेऊन पोहोचले होते अमिताभ बच्चन, बघा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 10:16 AM2022-04-14T10:16:45+5:302022-04-14T10:19:31+5:30
Ranbir - Alia Wedding : रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चेत ऋषी कपूर यांच्या लग्नाचेही किस्से समोर येत आहेत. असाच एक किस्सा म्हणजे ऋषी कपूर यांच्या लग्नात अमिताभ बच्चन हे मोडलेल्या हातासोबत आले होते.
![When Amitabh Bachchan spotted with bandaged hand in Rishi Kapoor wedding | जेव्हा ऋषी कपूर यांच्या लग्नात मोडलेला हात घेऊन पोहोचले होते अमिताभ बच्चन, बघा फोटो When Amitabh Bachchan spotted with bandaged hand in Rishi Kapoor wedding | जेव्हा ऋषी कपूर यांच्या लग्नात मोडलेला हात घेऊन पोहोचले होते अमिताभ बच्चन, बघा फोटो](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/amitabh-rishi1_202204805648.jpg)
जेव्हा ऋषी कपूर यांच्या लग्नात मोडलेला हात घेऊन पोहोचले होते अमिताभ बच्चन, बघा फोटो
Ranbir - Alia Wedding : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपलपैकी एक रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आज १४ एप्रिलला सात फेरे घेणार आहेत. रणबीरच्या लग्नात आज ऋषी कपूर (Rishi Kapoor) असते तर बातच वेगळी राहिली असती. सर्वांच्या लग्नात रौनक वाढवणारे ऋषी कपूर यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नात वेगळाच जल्लोष केला असता. रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चेत ऋषी कपूर यांच्या लग्नाचेही किस्से समोर येत आहेत. असाच एक किस्सा म्हणजे ऋषी कपूर यांच्या लग्नात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे मोडलेल्या हातासोबत आले होते.
अमिताभ बच्चन यांनी एकदा आपल्या ब्लॉगमध्ये ऋषी कपूर यांच्या लग्नाशी संबंधित एक किस्सा शेअर केला होता. बिग बी म्हणाले होते की, कशाप्रकारे हाताला बॅंडेज बांधून ते ऋषीच्या वरातीत पोहोचले होते. पण त्यांना झालं काय होतं हेही त्यांनी सांगितलं. त्यावेळी अमिताभ बच्चन चेन्नईमध्ये एका सिनेमाचं शूटिंग करत होते. त्यावेळी त्यांचा अपघात झाला होता.
ते सिनेमातील एका गाण्याचं शूट करत होते. ज्यात त्यांना दोरीच्या मदतीने स्लाइड करत खाली उतरायचं होतं. तेव्हाच त्यांना हात दोरीवरून सुटला आणि ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या हाताला गंभीर इजा झाली. हाताला प्लास्टर करण्याची वेळ आली होती. त्यांना टाकेही लावावे लागले होते.
अमिताभ बच्चन यांच्या या अपघाताचं टायमिंग खराब होतं कारण ऋषी कपूर आणि नीतू कपूरच्या लग्नात त्यांना जायचं होतं. आता मित्राचं लग्न आहे म्हटल्यावर जावं तर लागेलच. तेव्हा अमिताभ बच्चन कशाचाही विचार न करता हातावर पट्टी बांधून ऋषी कपूर यांच्या लग्नात पोहोचले होते. अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची मैत्री किती चांगली होती हे यावरून स्पष्ट दिसतं.