वेगळे प्रयोग करता आले पाहिजेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:11 AM2016-01-16T01:11:40+5:302016-02-06T07:54:12+5:30

आपला मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे, एक विशिष्ट चौकट सोडून नाटकातही वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत आणि ते ...

Must be used separately | वेगळे प्रयोग करता आले पाहिजेत

वेगळे प्रयोग करता आले पाहिजेत

googlenewsNext
ला मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे, एक विशिष्ट चौकट सोडून नाटकातही वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत आणि ते यशस्वी होत आहेत, ही खरोखरच कौतुकाची बाब आहे. पण आपलं हे यश टिकवणे आणि त्यात अजून प्रगती करण्यासाठी प्रत्येक कलाकाराने सतत नवीन काहीतरी शिकायची तयारी ठेवली पाहिजे. त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे म्हणजे केवळ यशाचा विचार न करता प्रक्रियेवर लक्ष दिले पाहिजे. कारण काम उत्तम असेल तर यश नक्कीच तुमचं आहे. पण ते काम करताना तुम्हाला किती मजा आली, त्याचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळालं का, याचा विचार करणे जास्त गरजेचे आहे. जेव्हा त्या प्रक्रियेशी आपण प्रामाणिक राहतो, तेव्हा ती प्रत्येक वेळी आपल्याला नवीन काहीतरी शिकवत जाते. कोणत्याही चित्रपट, नाटक किंवा मालिकेसाठी सर्वांत महत्त्वाचे असते ते कथानक. तोच त्याचा आत्मा असतो. कारण कथानक चांगले वाटले तरच कलाकार, दिग्दर्शक, निर्माते तो चित्रपट स्वीकारतात. इतकेच नाही तर आजकाल गाण्यांमुळे चित्रपट हिट होत आहेत असं म्हटलं जात असलं तरी ते दीर्घकाळासाठी म्हणता येणार नाही. पण त्याबरोबरच.. कदाचित त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं ते चित्रपटाचे कथानक. त्यामुळे चित्रपटाची स्टोरी प्रेक्षकांना आवडली तरच तो चित्रपट खर्‍या अर्थाने सुपरहिट ठरतो. सध्या एक नाव बर्‍याच जणांच्या म्हणजे केवळ निर्माते, दिग्दर्शकांच्याच नाही तर प्रेक्षकांच्याही चर्चेत आहे. ते म्हणजे क्षितिज पटवर्धन.या लेखकाने लिहिलेल्या कथांवर एकापाठोपाठ एक सलग पाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट करून दाखवले आहेत. टाइमपास, क्लासमेट्स, डबल सीट, लग्न पाहावे करून आणि टाइम प्लीज हेच ते पाच चित्रपट. अर्थात यातला टाइम प्लीज हा चित्रपट त्यानेच लिहिलेल्या 'नवा गडी नवं राज्य' या नाटकावर आधारित आहे. हे नाटकही प्रेक्षकांना तितकंच भावलं आणि चित्रपटानेही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. बरं हे एकच नाटक नव्हे तर पत्रकारिता जगताच्या भोवती फिरणारे आणि नुकतेच डायमंड ज्युबिली प्रयोगांचा टप्पा पार केलेले नाटक म्हणजे 'दोन स्पेशल' तर सध्या प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत आहे. या यशस्वी नाटक आणि चित्रपटाचा लेखक क्षितिज पटवर्धनने 'सीएनएक्स'शी आपले अनुभव शेअर केले.

Web Title: Must be used separately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.