९ पेग अन् मग ९ मिनिटांत लिहिलं गाणं... जावेद अख्तर यांच्या 'या' लोकप्रिय गाण्यामागची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 15:58 IST2025-01-25T15:30:50+5:302025-01-25T15:58:59+5:30

जावेद अख्तर यांनी लिहिलेलं हे गाणं आज अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये असेल. पण या लोकप्रिय गाण्यामागचा किस्सा फार कमी जणांना माहित असेल

जावेद अख्तर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय गीतकार आणि पटकथालेखक. 'शोले', 'दीवार', 'जंजीर' यांसारख्या लोकप्रिय सिनेमांचं लेखन जावेद यांनी सलीम खान यांच्यासोबत केलं

जावेद अख्तर यांची केवळ पटकथाकार म्हणून ओळख नाही. तर गीतकार म्हणूनही त्यांना आदराचं स्थान आहे.

जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत त्यांनी ९ पेग मारुन एक लोकप्रिय गाणं कोणतं लिहिलं होतं त्याचा किस्सा सांगितला होता.

हे गाणं होतं 'साथ साथ' सिनेमातील 'तुमको देखा तो ये खयाल आया'. या सिनेमाचे दिग्दर्शक रमन कुमार यांनी जावेद अख्तर यांना सिनेमासाठी गाणं लिहिण्याची विनंती केली होती.

रमन कुमार यांनी जावेद साबना या गाण्यासाठी पैसे मिळणार नाहीत असं आधीच सांगितलं होतं. त्यामुळे जावेद साब लिखाणासाठी टाळाटाळ करायचे.

एकदा मात्र रमन कुमार त्यांच्या घरी आले. त्यावेळी जावेद साब खाण्या-पिण्याचे शौकीन होते. त्यांनी ८ - ९ पेग रिचवले होते.

अखेर रमन कुमार यांच्या समोरच केवळ ९ मिनिटात जावेद अख्तर यांनी गाणं लिहिलं. हे गाणं पुढे जगजीत सिंग यांनी गायलं. आज 'तुमको देखा तो ये खयाल आया' हे गाणं अनेकांचं फेव्हरेट आहे.