अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न होऊ नये म्हणून 'या' अभिनेत्रीने कापली होती हाताची नस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 02:44 PM2024-08-23T14:44:35+5:302024-08-23T15:00:54+5:30

आजही चाहत्यांमध्ये ऐश्वर्या - अभिषेक यांच्या लग्नाची चर्चा रंगलेली असते.

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडपं आहेत. दोघांना आराध्या नावाची मुलगीदेखील आहे. हे दोघेही कायम चर्चेत असतात.

गेल्या 20 एप्रिल रोजी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाला ( Abhishek- Aishwarya Marriage) सतरा वर्षे पूर्ण झाली आहेत. ऐश्वर्याने महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत 20 एप्रिल 2007 मध्ये लग्न केले होते.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

अखेर अभिषेक याने 2007 मध्ये न्यूयॉर्क येथील अपार्टमेंट मधील बालकनीतून ऐश्वर्या हिला लग्नाची मागणी घातली होती. तेव्हा दोघांनी एकत्र असल्याची अधिकृत घोषणा केली होती. यानंतर दोघे लग्नबंधनात अडकले. पण, तुम्हाला माहितेय त्यांच्या लग्नात मोठी अडचण आली होती.

जेव्हा दोघेही लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार होते, त्यावेळी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याला कठीण परीक्षेतून जावं लागलं होतं.

अभिषेक आणि ऐश्वर्या याचं लग्न होऊ नये म्हणून एका मॉडेलने आपल्या हातची नस कापली होती. जान्हवी कपूर असं तिचं नाव होतं. अभिषेक बच्चनसाठी हाताची नस कापणाही ही जान्हवी कपूर बोनी कपूर यांची लेक व अभिनेत्री जान्हवी नव्हे. तर ती एक मॉडेल होती.

संबंधित मॉडेलने अभिषेक बच्चनसोबत तिचं २००६ मध्ये लग्न झाल्याचा गंभीर दावा केला होता. एवढंच नाहीतर तिने थेट याबाबतची तक्रार पोलिसांत देखील दाखल केली होती. परंतू कोणतेही पुरावे नसल्याने पोलिसांनी कारवाई केली नव्हती.

त्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. त्याचा परिणाम ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नसोहळ्यावरही झाल्याचं बोललं जातं. अभिषेक आणि ऐश्वर्या यांचा लग्न समारंभ खाजगी पद्धतीने पार पडला होता.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असुनही यांच्या लग्नात फार कमी लोकांना आमत्रंण देण्यात आलं होतं.

अमिताभ बच्चन यांची आई तेजी बच्चन या त्यावेळी आजारी होत्या, त्यामुळे हे लग्न साधेपणाने पार पडले, असे बच्चन कुटुंबाकडून सांगण्यात आलं होतं.

त्याकाळी ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांचं लग्न हा चांगलच चर्चेत आलं होतं. बॉलिवूड इंडस्ट्रीतील गॉसिपचा हा सर्वात हॉट टॉपिक होता. दोघांनी अडचणींवर मात करत एकमेंकाची साथ दिली, ती आजतागायत निभावत आहे. दोघांना आराध्या नावाची गोड मुलगीदेखील आहे.