Rakhi Sawant : "मी दागिने विकून तुला 1.5 कोटी दिले, पैसे कधी परत करणार?"; राखीच्या प्रश्नावर आदिल म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 01:40 PM2023-02-09T13:40:55+5:302023-02-09T13:54:44+5:30

Rakhi Sawant And Adil Khan : आईचे नुकतेच निधन झाले असून तिच्या निधनानंतर राखी सावंतच्या वैवाहिक जीवनात खळबळ उडाली आहे.

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या खूप जास्त चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या आईचे नुकतेच निधन झाले असून तिच्या निधनानंतर राखी सावंतच्या वैवाहिक जीवनात खळबळ उडाली आहे. राखीने पती आदिल खानवर अनेक गंभीर आरोप केले असून त्याला तुरुंगात पाठवले आहे.

राखीचा आणखी एक व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्यामध्ये ती आदिल खानकडे पैसे मागताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोक हैराण झाले आहेत. व्हिडीओमध्ये राखीसमोर आदिल खान बसलेला दिसत आहे.

राखी व्हिडिओमध्ये विचारत आहे की, "तू माझ्याकडून घेतलेले दीड कोटी रुपये कधी देणार आहेस." त्यावर आदिल म्हणतो की, चार महिन्यात आणि तेही नफ्यासह, हे ऐकल्यानंतर राखी तिला नफा नको, तिला फक्त तिचा पैसा हवा आहे, जे तिने मेहनतीने कमावले आहे असे म्हणताना दिसते.

आदिल नफा तुझ्याकडे ठेव पण पैसे परत कर, असे ती म्हणताना दिसते. तिचे दागिने विकून हे पैसे दिले आहेत असंही तिने म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये आदिलच्या हातात औषधाचं एक प्रिस्क्रिप्शन आहे आणि तो राखीच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अत्यंत दबक्या आवाजात देत आहे.

स्मॉल स्क्रीन ड्रामा क्वीन राखी सावंतने अलीकडेच तिचा पती आदिल खान दुर्रानीवर अनेक गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सात फेब्रुवारीला आदिलला अटक केली.

राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत याने आदिल खानबद्दल खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, आई जया भेडा यांच्या निधनाच्या दिवशी आदिल खानने राखी सावंतवर हल्ला केला होता.

वृत्तानुसार, राखी सावंतने गेल्या वर्षी 29 मे रोजी आदिल खानसोबत मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न केले होते. यापूर्वी राखीने रितेश राज सिंहसोबत लग्न केलं होतं, मात्र दोघांचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

राखी सावंतने पती आदिल खानला मीडियासमोर इशारा दिला होता. आदिलवर फसवणूक केल्याचा आरोप केला होता आणि मीडियालाही त्यांनी आदिलला सपोर्ट करू नये आणि त्याची मुलाखत घेऊ नये असे सांगितले होते. मात्र आदिल खान दुर्रानी यांने आता यावर भाष्य केलं होतं.

राखीने केलेल्या आरोपावर आणि या संपूर्ण प्रकरणावर आदिल खानने आपले मौन सोडले. त्याने इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली होती. राखीबद्दलच्या प्रत्येक गोष्टीला त्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीद्वारे उत्तर दिलं होतं.

आदिल खानने आपल्या इन्स्टा स्टोरीवर लिहिले होते की, "जर मी त्या महिलेबद्दल परत बोलत नाही तर याचा अर्थ असा नाही की मी चुकीचा आहे. कारण मी माझ्या धर्माचा आदर करतो आणि स्त्रीचा आदर करायला शिकवले आहे, म्हणून मी गप्प आहे."

त्याने पुढे लिहिले होते की, "ज्या दिवशी मी तोंड उघडून लोकांना खरं सांगेन की ती माझ्यासोबत काय करत आहे आणि मी काय करत आहे, तेव्हा ती काहीही बोलू शकणार नाही. याच कारणामुळे ती रोज मीडियासमोर येते आणि लोकांना सांगते की आदिल खूप वाईट आहे."

आदिलचे कोणत्या तरी मुलीसोबत अफेअर सुरू आहे आणि याच कारणामुळे तो सर्वांसमोर लग्नाची बाब मान्य करत नव्हता. राखीने आदिलवर गंभीर आरोप करत तिला श्रद्धा वालकरप्रमाणे फ्रीजमध्ये जायचे नसल्याचं सांगितलं आहे. राखीने अलीकडेच आदिल दुर्रानीसोबतच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.