पहिल्या पतीपासून या कारणामुळे वेगळी झाली होती रेणुका शहाणे, मग आशुतोषसोबत थाटला दुसरा संसार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 11:28 AM2023-10-07T11:28:03+5:302023-10-07T11:35:52+5:30

Renuka Shahane : रेणुका शहाणेने २००१ मध्ये अभिनेता आशुतोष राणा यांच्याबरोबर लग्न केले.

अभिनेत्री रेणुका शहाणे हिने ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात सलमान खानसोबत सहाय्यक भूमिका साकारली होती. या भूमिकेतून ती रातोरात स्टार बनली. ही भूमिका लोकांना खूप आवडली.

रेणुकाने २००१ मध्ये अभिनेता आशुतोष राणा यांच्याबरोबर लग्न केले. हे तिचे दुसरे लग्न आहे. तिचं दुसरं लग्नही टिकणार नाही, असे अनेकांनी तिला म्हटले होते.

रेणुका शहाणेने मिड डेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, आशुतोषसोबतचे तिचे लग्न महिनाभरही टिकणार नाही, असा प्रश्न तिच्या जवळचे लोक उपस्थित करत होते.

कारण आशुतोषची कौटुंबिक पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी होती. रेणुका महाराष्ट्रातील होती, तर आशुतोष राणा मध्य प्रदेशातील एका छोट्या गावातला होता, पण त्यांचे कुटुंब खूप मोठे होते. रेणुका त्यांच्या संस्कृतीशी जुळवून घेऊ शकेल की नाही, अशी भीती रेणुकाच्या कुटुंबियांना वाटत होती.

रेणुका शहाणे आशुतोष राणासोबत दुसरे लग्न करणार होती. यासाठी तिलाही खूप काळजी घ्यावी लागली. खूप विचारविनिमय केल्यानंतर तिने लग्नाला होकार दिला. रेणुकाला लग्न म्हणजे जुगारच वाटत होतं. हे लग्न चालेल की नाही याची शाश्वती नसल्याचेही तिने सांगितले.

तिला असे वाटले की चांगले मित्र नेहमीच चांगले भागीदार नसतात. तरीही रेणुका शहाणेने आशुतोष राणासोबत लग्न केले. दोघेही एकमेकांचे कौतुक करायचे. रेणुकानेही त्यांच्या कुटुंबाची पद्धत जाणून घेतली. रेणुका तिच्या पहिल्या लग्नापासून खूप शिकली होती. त्यामुळे त्याला थोडा वेळ लागला पण तिने आशुतोष आणि त्याच्या कुटुंबाशी जुळवून घेतले.

आशुतोषच्या आधी रेणुकाचे लग्न विजय केंकरे यांच्याशी झाले होते. विजय केंकरे हे मराठी रंगभूमीचे लेखक आणि दिग्दर्शक होते. विजय आणि रेणुका यांचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांनीही लवकरच घटस्फोट घेतला.

एका मुलाखतीत रेणुकाने सांगितले की, लग्नानंतर दोघांमध्ये काम करण्याच्या पद्धतींवरून अडचणी निर्माण होऊ लागल्या. त्यावेळी मी परिपक्व नव्हते. पहिल्या लग्नातून खूप काही शिकायला मिळाले.

अनेक रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, दोघांमध्ये अनेक गोष्टींवरून वाद होत होते. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.