लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीने मित्रांकडे केला लिलाव, गरोदरपणात सासूची मारहाण; बॉलिवूड अभिनेत्रीने लग्नानंतर भोगला वनवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 06:30 PM2024-01-18T18:30:22+5:302024-01-18T18:36:25+5:30

पतीची मित्रांबरोबर शारीरिक संबंध बनवण्याची मागणी अन् सासुरवास; बॉलिवूड अभिनेत्रीला मिळालं नाही वैवाहिक सुख

अभिनय आणि सौंदर्याने ९०चं दशक गाजवणारी अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. 'राजा हिंदुस्तानी', 'दिल तो पागल है', 'हम साथ साथ है', 'हिरो नं १', 'बिवी नं १' अशा सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून अभिनेत्रीने तिचा करीश्मा दाखवला.

बॉलिवूडमधील करिअरपेक्षा करिश्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत होती. २००३ मध्ये करिश्माने व्यावसायिक संजय कपूरशी विवाह करत संसार थाटला होता.

पण, लग्नानंतर करिश्माच्या वाट्याला कधीच सुख आलं नाही. लग्नानंतर तिला सासरी मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागलं होतं.

करिश्माने एका मुलाखतीत लग्नानंतरच्या आयुष्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. लग्नाच्या पहिल्याच रात्री संजय कपूरने करिश्माला मित्रांसोबत शारीरिक संबंध बनवण्यास सांगितलं होतं.

पतीचं हे बोलणं ऐकून करिश्माच्या पायाखालची जमीनच सरकली होती. करिश्माबरोबर शारीरिक संबंध बनवण्यासाठी मित्रांना त्याने त्याची किंमतही सांगितली होती.

करिश्माने यासाठी नकार दिल्यानंतर पतीने तिला मारलंदेखील होतं. केवळ पतीनेच नाही तर करिश्माच्या सासूनेही तिचा छळ केला होता.

प्रेग्नंन्सीदरम्यान सासूने मारल्याचा खुलासाही करिश्माने केला होता. तर करिश्माच्या पतीने त्याच्या भावाला अभिनेत्रीवर नजर ठेवण्यास सांगितलं होतं.

करिश्माने तरीदेखील तिचा संसार टिकवण्याचा खूप प्रयत्न केला. पण, दोन मुलांनंतरही त्यांच्या नात्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे करिश्माने घटस्फोट घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

२०१६ साली म्हणजेच लग्नानंतर ११ वर्षांनी करिश्मा पतीपासून कायदेशीररित्या घटस्फोट घेत वेगळी झाली. त्यानंतर लगेचच तिच्या पतीने गर्लफ्रेंड प्रिया सचदेवसोबत विवाह केला.