अखेर त्यांची प्रतिक्षा संपली ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2016 01:58 PM2016-10-29T13:58:43+5:302016-10-29T13:58:43+5:30

''अपनी किस्मत से बेखबर' म्हणत दोघेही 'परदेस में है मेरा दिल'च्या निमित्तान 7 नोव्हेंबर पासून रसिकांच्या भेटीला.

He finally ended his waiting? | अखेर त्यांची प्रतिक्षा संपली ?

अखेर त्यांची प्रतिक्षा संपली ?

googlenewsNext
 &#
39;परदेस में है मेरा दिल' या नव्या मालिकेची गेल्या काही महिन्यापासून जोरदार चर्चा सुरू आहे. या मालिकेचे काही भाग ऑस्ट्रीयात शूट करण्यात आल्यामुळे ही मालिका पाहण्यासाठी रसिकांची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे. मालिकेत 'नागिन' फेम अर्जुन बिजलानी आणि मधुबाला फेम दृष्टी धामी हे मुख्यभूमिकेत झळकणार आहेत. 'नागिन 2' मध्ये अर्जुन बिजलानी जरी झळकणार नसला तरीही 'परदेस में है मेरा दिल' म्हणत तो त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो टील्हीवर झळकतोय.प्रोमोमध्ये सगळे काही फ्रेश लोकेशन्स दिसत असल्यामुळे मालिकेची कथाही रंजक असणार असल्याचे रसिकांना वाटतेय. दृष्टी धामी आणि अर्जुन बिजलानी यांची लोकप्रियता बघता 'परदेस में है मेरा दिल' मालिकेला नक्की फायदा होईल असे दिग्दर्शक नीरज बालियालाने सांगितले आहे.



प्रोमोमध्ये दृष्टी आणि अर्जुन दोघेही हटके दिसातायेत.मालिेकेत अर्जुन एनआरआयच्या भूमिका साकरतोय तर दृष्टी नयनाच्या भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेसाठी दृष्टीने खास मेकओव्हरही केला आहे.भूमिकेची गरज म्हणून तिला तिचे मोठे केस कापावे लागले. इतकी मेहनत घेतलेल्या कलाकारांना मालिकेच्या टीमला या मालिकेापासून खूप सा-या अपेक्षा आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अर्जुन आणि दृष्टी ''अपनी किस्मत से बेखबर' म्हणत दोघेही 'परदेस में है मेरा दिल'च्या निमित्तान 7 नोव्हेंबर पासून रसिकांच्या भेटीला येणार आहेत.  

Web Title: He finally ended his waiting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.