अप्पी आमची कलेक्टर: दिप्या-सिंबामुळे अप्पी-अर्जुन येणार एकत्र; मामा-भाच्याने आखला नवा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 11:27 AM2024-06-13T11:27:41+5:302024-06-13T11:28:03+5:30
Appi amchi collector: सिंबाला अर्जुनचं सत्य कळलं असून आता तो त्याच्या आई-वडिलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे.
![MARATHI TV SERIAL Appi amchi collector Appi-Arjun will come together because of Dipya-Simba | अप्पी आमची कलेक्टर: दिप्या-सिंबामुळे अप्पी-अर्जुन येणार एकत्र; मामा-भाच्याने आखला नवा प्लॅन MARATHI TV SERIAL Appi amchi collector Appi-Arjun will come together because of Dipya-Simba | अप्पी आमची कलेक्टर: दिप्या-सिंबामुळे अप्पी-अर्जुन येणार एकत्र; मामा-भाच्याने आखला नवा प्लॅन](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/420x315/whatsapp-image-2024-06-13-at-11.04.12-am-1_2024061248558.jpeg)
अप्पी आमची कलेक्टर: दिप्या-सिंबामुळे अप्पी-अर्जुन येणार एकत्र; मामा-भाच्याने आखला नवा प्लॅन
छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे अप्पी आमची कलेक्टर. ही मालिका सुरु झाल्यापासून तिने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. या मालिकेत आतापर्यंत अर्जुन आणि अप्पीच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. मात्र, त्या दोघांनी एकत्रपणे त्याला तोंड दिलं. मात्र, तब्बल ७ वर्षांच्या दुराव्यानंतर या दोघांच्या नात्याला वेगळं वळण लागलं आहे. लवकरच ते विभक्त होणार आहेत. त्यामुळे सिंबा त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतोय. त्याच्या या प्लॅनमध्ये त्याला आता दिप्या मामाचीही साथ मिळणार आहे.
वज्र प्रोडक्शनने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सिंबा दिप्याला त्याच्या वडिलांचं सत्य कळल्याचं सांगतो. सोबतच मा आणि बाबाला एकत्र करण्यासाठी मदत करशील का? असही त्याला विचारतो.
अर्जुनच्या साखरपुड्याच्या दिवशीच सिंबाला अर्जुन आपले वडील असल्याचं समजतं. त्यामुळे आता अर्जुन आणि अप्पीला एकत्र आणण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. त्याच्या या प्लॅनमध्ये त्याचे मित्रही त्याची साथ देत आहेत. परंतु, आता अप्पी आणि अर्जुनला एकत्र आणण्यासाठी त्या दोघांना आसगावला घेऊन जाणं महत्त्वाचं आहे. परंतु, त्या दोघांना एकत्र गावी नेणं सिंबाला शक्य नाही. त्यामुळे त्याने दिप्याची मदत मागितली आहे.
दरम्यान, सिंबाचे हे प्रयत्न पाहून दिप्या सुद्धा त्याला साथ द्यायचं ठरतो आणि दोघं मिळवून नवा प्लॅन तयार करतात. परंतु, ही गोष्ट मोनाला कळली आहे. त्यामुळे या मालिकेत आता पुढे काय होणार? दिप्या-सिंबाचा प्लॅन यशस्वी होईल का? अप्पी-अर्जुन एकत्र येतील का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.