'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 11:27 AM2024-06-02T11:27:27+5:302024-06-02T11:28:46+5:30

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोंखडेचा डेब्यू टेलिव्हिजन शो 'पवित्र रिश्ता'ला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Pavitra Rishta Completed 15 Years Ankita Lokhande Pens Emotional Note And Remembers Sushant Singh Rajput | 'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावुक

'सुशांत नाही तर...', 'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पुर्ण होताच अंकिता लोखंडे झाली भावुक

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोंखडेचा डेब्यू टेलिव्हिजन शो 'पवित्र रिश्ता'ला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. इतक्या वर्षानंतरही या मालिकेबद्दल प्रेक्षक भरभरून बोलतात. पवित्र रिश्ता मालिका ही अर्चना आणि मानव यांची लव्हस्टोरी होती.  याच मालिकेदरम्यान अंकिता आणि सुशांत एकमेंकाच्या प्रेमात पडले होते. मात्र यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. आता मालिकेला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं अंकितानं एक खास भावूक पोस्ट शेअर केली आहे. सुशांतसोबतचे काही फोटोसुद्धा तिने पोस्ट केले आहेत.

'पवित्र रिश्ता'ला 15 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. अंकितानं पोस्टमध्ये लिहलं, 'पवित्र रिश्ता'च्या अर्चनापासून माझा प्रवास सुरू झाला. इतकत्या वर्षांनंतरही अर्चनाला इतके प्रेम मिळत राहील, याची कल्पना नव्हती. अर्चना होणे हे माझ्या नशिबी होतं.  अर्चना हीच माझी ओळख बनली. अर्चनाकडून मी खूप काही शिकले. ही एक उत्कृष्ट भूमिका दिल्याबद्दल एकता कपूरचे खूप आभार'.

एवढेच नाही तर अंकिताने या पोस्टमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख केला आहे. तिने लिहलं, 'जर सुशांत नसता आणि  त्याची साथ मिळाली नसती, तर कदाचित मी हा प्रवास कधीच पूर्ण करू शकले नसते. त्याच्याशिवाय हा प्रवास अपूर्णच राहिला असता. करिअरची सुरुवात केली, तेव्हा अभिनय कसा करावा, हेही माहित नव्हतं. परंतु सुशांतने ते मला शिकवलं. यासाठी सुशांतची कायमच आभारी राहिलं'. यासोबतच अंकिताने पोस्टच्या शेवटी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचेही आभार मानले. 

 'पवित्र रिश्ता' मालिकेपासून करिअरची सुरुवात केल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे हिनं कधीही मागे वळून पाहिलं नाही.  पवित्र रिश्ता मालिकेमुळं अंकिता आणि सुशांत खऱ्या आयुष्यातही एकत्र आले होते. अंकिता आणि सुशांत अनेक वर्षे नात्यात होते. पण दोघांचा ब्रेकअप झाला आणि दोघही आपापल्या आयुष्यात पुढं गेले. सुशांतशी ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताला प्रचंड त्रास झाला. पण त्यानंतर तिच्या आयुष्यात विकी आला. पण सुशांत मात्र हे जग सोडून गेला. त्यामुळं सुशांतचे चाहते त्याच्या आठवणीत आजही पोस्ट शेअर करताना दिसतात.

Web Title: Pavitra Rishta Completed 15 Years Ankita Lokhande Pens Emotional Note And Remembers Sushant Singh Rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.