राजा रानीची गं जोडी मध्ये रणजीत–कुसुमावतीमध्ये असलेला अबोला दूर होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 16:15 IST2021-06-25T16:14:02+5:302021-06-25T16:15:13+5:30
इतक्या महिन्यांपासून रणजीत–कुसुमावती एकमेकांशी आपुलकीने बोलत नाही याचा संजूला खूप त्रास होत आहे.

राजा रानीची गं जोडी मध्ये रणजीत–कुसुमावतीमध्ये असलेला अबोला दूर होणार?
राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी आईसाहेबांनी म्हणजेच कुसुमावतीने संजूला गर्भपात करण्यास भाग पाडले होते, हे सत्य बेबीमावशीने सगळ्यांपुढे आणले होते. रणजीतला याबद्दल काहीही कल्पना नसताना, त्याला खोट सांगून आईसाहेबांनी हा प्रकार घडवून आणला. हेदेखील रणजीतला समजले. त्या दिवसापासून रणजीतने कुसुमावतीला आई म्हणणार नाही असे वचन दिले होते. त्यानंतर मालिकेमध्ये नऊ महिन्यांचा लीप घेण्यात आला आणि संजू PSI बनून ढालेपाटलांच्या घरी आली. पण इतके महीने जाऊन देखील रणजीत आणि कुसुमावती मधील अबोला तसाच कायम आहे हे संजूला जावणले.
इतक्या महिन्यांपासून दोघे एकमेकांशी आपुलकीने बोलत नाही याचा संजूला खूप त्रास होत आहे. यामुळेच संजू आईसाहेबांना वचन देते की, आता मी आली आहे ‘रणजीत आणि तुमच्यामधील अबोला मी नक्कीच दूर करेन’... पण संजूने दिलेल्या या वचनाविषयी रणजीतला काहीही कल्पना नाहीये.
येत्या काही भागांमध्ये रणजीत कुसुमावतीला आईसाहेब म्हणून पुन्हा हाक मारणार आहे. पण असे काय घडले ज्यामुळे त्याने आईसाहेब अशी हाक मारली? त्यांच्यातील दुरावा संजू पूर्णपणे मिटवू शकेल? त्यासाठी ती अजून काय प्रयत्न करेल? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.