या कारणामुळे झाली 'गुत्थी'ची वापसी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2016 04:44 PM2016-10-28T16:44:38+5:302016-10-28T17:06:37+5:30
'द कपिल शर्मा' शोमध्ये अचानक गुत्थीची एंट्री झाल्यामुळे रसिकांना अनेक प्रश्न पडले आहेत.सुनील ग्रोव्हर रंगवत असलेले गुत्थी हे पात्र ...
' ;द कपिल शर्मा' शोमध्ये अचानक गुत्थीची एंट्री झाल्यामुळे रसिकांना अनेक प्रश्न पडले आहेत.सुनील ग्रोव्हर रंगवत असलेले गुत्थी हे पात्र फक्त 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' या शोमध्ये होते.नंतर सिनेमाच्या शुटींगमध्ये बिझी असल्यामुळे सुनिलने 'कॉमेडी नाईटस विथ कपिल' शोमधून ब्रेक घेतला. त्यावेळी कपिल शर्मा आणि सुनील यांच्यामध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. कपिल शर्माने काही करणांमुळे 'द कपिल शर्मा' नावाने दुस-या चॅनलवर शो सुरू केला.त्यात नव्या पात्रासह सुनील ग्रोव्हरची पुन्हा एकदा दणक्यात एंट्री झाली.मात्र गुत्थीची मजा काही वेगळीच असल्यामुळे रसिकांना पुन्हा एकदा सुनीलने गुत्थी बनत मनोरंजन करावे अशी इच्छा होती. रसिकांची हीच इच्छा सुनीलने गुत्थी पूर्ण केली.सिनेमाच्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर,ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्माने हजेरी लावली. त्यावेळी एका गुत्थीची पुन्हा एकदा दणक्यात एंट्री झाली. मध्येच गुत्थीची एंट्री झाल्यामुळे वेगवेगळे प्रश्नचिन्ह उभे राहणे साहजिकच आहे. तर त्याचे झाले असे की गेल्याच वर्षी गुत्थीने रणबीर कपूरसह या शोमध्ये कॉमेडीस्कीट केले होते.त्यात गुत्थीने रणबीर कपूरशी लग्न केल्याचे पाहायला मिळाले. आजही तो भाग रसिकांना आठवताच हसून हसून लोटपोट करतो. पुन्हा एकदा तसाच भाग यंदा रंगवण्यात आला होता. गुत्थीला रणबीर कपूरपासून घटस्फोट घ्यायचा असतो.त्यासाठी गुत्थीची मजेशीर एंट्री झाल्याचे पाहायला मिळाले. पुन्हा एकदा तोच गुत्थीचा अंदाज पाहणे रसिकांसाठी एक मनोरंजनाची पर्वणीच ठरली.