By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2016 08:00 AM2016-06-14T08:00:15+5:302016-06-14T13:30:15+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत प्रेक्षकांना दयाबेनचे स्वयंवर पाहायला मिळणार आहे. दयाचे लग्न झाले असून तिला एक ...
Next
n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत प्रेक्षकांना दयाबेनचे स्वयंवर पाहायला मिळणार आहे. दयाचे लग्न झाले असून तिला एक मुलगादेखील आहे. पण बावरीच्या कुटुंबियांना दया ही बाघाची बहिण असून तिचे लग्न झालेले नाही असे सांगण्यात आलेले आहे. बाघाचा काहीच दिवसांत साखरपुडा होणार आहे. पण त्याच्या मोठ्या बहिणीच्या लग्नाचा कोणीही विचार करत नाहीये ही गोष्ट बावरीच्या कुटुंबियांना पटत नाहीये. त्यामुळे त्यांनी आता दयाचे लग्न करायचे ठरवले आहे. दयासाठी ते खूप सारी मुले पाहाणार असून या मुलांमधून कोणाशी लग्न करायचे हा निर्णय दयाला घ्यायला त्यांनी सांगितलेला आहे. या सगळ्यामुळे दया खूपच टेन्शनमध्ये आली आहे. या संकटातून कोणी तरी तिला बाहेर काढावे असे ती सांगते.