‘थिएटरमुळे कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळतो’

By Admin | Published: March 8, 2017 05:27 AM2017-03-08T05:27:12+5:302017-03-08T05:27:12+5:30

छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘दिया और बाती हम’ ही मालिका नव्या ढंगात आणि नव्या रूपात रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘तू सूरज मै सांज पिया जी’ या नावाने या मालिकेचा सिक्वेल

'Theater gives artists the artistic talent' | ‘थिएटरमुळे कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळतो’

‘थिएटरमुळे कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळतो’

googlenewsNext

-  Suvarna Jain

छोट्या पडद्यावर गाजलेल्या ‘दिया और बाती हम’ ही मालिका नव्या ढंगात आणि नव्या रूपात रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘तू सूरज मै सांज पिया जी’ या नावाने या मालिकेचा सिक्वेल लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच मालिकेतील रसिकांची आवडती व्यक्तिरेखा ‘भाभो’ अर्थात अभिनेत्री निलू वाघेला यांनी केरळमध्ये याची घोषणा केली. मालिकेच्या नव्या पर्वात रसिकांना अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळतील. या निमित्ताने अभिनेत्री निलू वाघेलाशी केलेली ही खास बातचीत...

'दिर और बाती हम' मालिकेचा दुसरा सीझन सिक्वेल रूपात लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. किती एक्साईटमेंट आहे?
- 'दिया और बाती हम' मालिकेने रसिकांना अलविदा केल्यानंतर काळ खूप कठीण होता. मात्र आता सात महिन्यांनंतर ही मालिका नव्या रूपात, नव्या ढंगात छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. याचा अतिशय आनंद होत आहे. ही मालिका घराघरांत लोकप्रिय झाली होती. मालिकेवर आणि मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहोत याचा आनंद होतोय. पहिला सीझन संपल्यानंतर रसिक पत्रे आणि ई-मेल पाठवून मालिकेचा सिक्वेल घेऊन यावा, अशी विनंती करत होते. आता सिक्वेल रूपात रसिकांच्या भेटीला येत असून, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.

दुसऱ्या सीझनमध्ये काय वेगळेपण असेल? पहिला सीझन जिथे संपला तिथूनच सिक्वेलची सुरुवात होईल का?
- 'दिया और बाती हम' मालिकेचा नवा सीझन अर्थात सिक्वेल रोमांचक असेल. या सिक्वेलची कथा केरळच्या बँकड्रॉपवर रंगेल. तसेच यात २० वर्षांचा लीप दाखवण्यात येणार आहे. सूरज आणि संध्याच्या मृत्यूनंतर मालिकेची कथा २० वर्षांनी पुढे जाईल. सिक्वेलमध्ये अनेक पॉझिटिव्ह गोष्टी रसिकांना पाहायला मिळतील. मालिकेची थीम पॉझिटिव्ह आहे. या मालिकेत अनेक ट्विस्ट असतील आणि रसिकांना ते नक्कीच आवडतील. मात्र सेटवर दीपिका आणि अनस यांना मी खूप मिस करेन. मात्र लाइफ मस्ट गो आॅन. जे कुणी सिक्वेलमध्ये नवे असतील त्यांचा चार्म काही वेगळाच असेल.

दुसऱ्या सीझनमध्ये भाभो किती बदलली आहे आणि कुटुंबातील इतर सदस्यांमध्येही काय बदल असणार आहे?
- 'दिया और बाती हम’ हा माझा पहिला असा शो आहे, की ज्याने इतकी लोकप्रियता मिळवली. रसिकांच्या प्रेमामुळे आणि लोकप्रियतेमुळे या मालिकेतील व्यक्तिरेखा कायम लक्षात राहतील. या मालिकेच्या लोकप्रियतेमुळे पुन्हा एकदा नवी मालिका नाही तर भाभोच्या रूपातच रसिकांसमोर येत आहे. तुमची भाभो काही बदललेली नाही. तिचं फक्त वय वाढलं आहे. तिचा अ‍ॅटिट्यूड, राग तसाच असला तरी लूकमध्ये बदल पाहायला मिळेल. चष्मा लावणं मला फार आवडत नाही. मात्र सारं काही नैसर्गिक वाटावं म्हणून लूक बदलण्यात आलाय. मग लेंहग्याच्या जागी साडी आणि चष्मा आला. तसंच या मालिकेतील कुटुंब तेच असले तरी त्यातील चेहरे बदलले आहेत.

तुमच्या अभिनय कारकिर्दीत थिएटरचं काय योगदान आहे ?
- थिएटरशी असलेलं नातं आजही कायम आहे याचा मला अभिमान आहे. माझ्यात आजही काही बदल झालेला नाही. थिएटरची पार्श्वभूमी असलेले कलाकार थिएट्रीकल अ‍ॅक्टिंग करतात असं बोललं जातं. मात्र माझ्या मते, थिएटरमुळे कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळतो. त्यांच्या अभिनय क्षमतेला नवे पैलू पडतात. सध्याचे थिएटर खूप नॅचरल आहे. त्यामुळे कॅमेऱ्याची भीती राहात नाही. तुमच्यात जिद्द असेल तर मग ‘सोने पे सुहागा’च.

भाभोची भूमिका साकारत असताना वैयक्तिक जीवन कसं आहे हे जाणून घ्यायला आवडेल?
- मला दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी.ज्या वेळी मी घरी जाते आणि तेव्हा हे सामान असं का ठेवलं आहे,
सामान अस्ताव्यस्त का पसरलंय असं मी बोलते. तेव्हा माझी मुलं मला म्हणतात,
की मम्मी आता तू घरी आहेस.
आता तू भाभो नाहीस त्यामुळे
त्या भूमिकेतून बाहेर ये असे ते
मला सांगतात.

Web Title: 'Theater gives artists the artistic talent'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.