इरफानसोबत काम करताना मज्जा आली!

By Admin | Published: June 1, 2016 02:38 AM2016-06-01T02:38:58+5:302016-06-01T02:38:58+5:30

इरफान खान याचा ‘मदारी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. निशिकांत कामत दिग्दर्शित ‘मदारी’ हा एक सोशल-थ्रीलर ड्रामा आहे. एका सामान्य व्यक्तीची कथा म्हणजे ‘मदारी’.

Working with Irfan came the marrow! | इरफानसोबत काम करताना मज्जा आली!

इरफानसोबत काम करताना मज्जा आली!

googlenewsNext

इरफान खान याचा ‘मदारी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. निशिकांत कामत दिग्दर्शित ‘मदारी’ हा एक सोशल-थ्रीलर ड्रामा आहे. एका सामान्य व्यक्तीची कथा म्हणजे ‘मदारी’. या व्यक्तीचे स्वत:चे एक प्रेमळ कुटुंब आहे. आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जगत असताना ही व्यक्ती व्यवस्थेचा बळी ठरते. त्याचे सगळे काही हिरावून घेतले जाते. मात्र तो पराभव न पत्करता स्वबळावर सर्व काही परत मिळवतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. ‘डोंबिवली फास्ट’, ‘मुंबई मेरी जान’ याप्रमाणे ‘मदारी’ हा सुद्धा वास्तवाची झालर असणारा चित्रपट आहे.‘मदारी’च्या निमित्ताने दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी ‘सीएनएक्स’च्या एडिटर जान्हवी सामंत यांच्याशी शेअर केलेले हे अनुभव...
‘मदारी’च्या निमित्ताने निशिकांत कामत यांची ‘सीएनएक्स’ला मुलाखत
प्रश्न : इरफानशी गट्टी कशी जमली?
4इरफान खान आणि मी आम्ही दोघे जुने मित्र आहोत. इरफान व मी टेलिव्हिजमधील संघर्षांच्या काळापासून एकत्र आहोत. पण ‘मुंबई मेरी जान’मध्ये मी इरफानला कास्ट केले आणि आमची मैत्री चांगलीच घट्ट झाली. इरफानने ‘मदारी’ची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी त्याने मला विचारले. ‘मदारी’ची स्क्रिप्ट आम्हा दोघांनाही आवडणारी अशीच होती. पण ती बरीच गुंतागुंतीची होती. आम्ही दोघांनीही त्यावर बरीच मेहनत घेतली. मुलगा गमावलेल्या एका सामान्य बापाची ही कथा आहे. एका दुर्घटनेत मुलगा गमावल्यानंतर या बापाच्या मनाची शांती हरवलेली असते. मात्र देशाच्या सरकारला त्याच्या या हानीची भरपाई करावी लागते. एक सामान्य नागरीक देशाच्या व्यवस्थेला आपल्या इशाऱ्यावर कसे नाचवतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे
प्रश्न : चित्रपटातील लोकशनच्या महत्त्वाबाबत काय सांगाल?
4शहर, शहरातील जीवन आणि काळानुरूप होणारे शहरी बदल हे सगळे मी जवळून अनुभवले आहे. हा अनुभव ‘डोंबिवली फास्ट’ आणि ‘मुंबई मेरी जान’मध्ये दिसते. काही चित्रपटांमध्ये स्थळ अर्थात लोकेशन केवळ प्रासंगिक असते. ‘फोर्स’ किं वा ‘दृश्यम’ हे चित्रपट असेच होते. म्हणजेच देशात कुठेही त्याचे शूटिंग होऊ शकले असते. याठिकाणी लोकेशन फार महत्त्वाचे ठरत नाही. मात्र ‘डोंबिवली फास्ट’ सारख्या चित्रपटासाठी मात्र लोकेशन सर्वाधिक महत्त्वाचे ठरते. याचप्रमाणे ‘मदारी’च्या कथेची शहरी पार्श्वभूमी ही गरज आहे. ‘सैराट’सारख्या चित्रपटाने लोकेशन, भाषेचा बाज आदी किती महत्त्वपूर्ण ठरते, हे दाखवून दिले आहे.
प्रश्न : ‘मदारी’च्या दिग्दर्शनाचा अनुभव कसा होता?
4 ‘मदारी’चा अनुभव खरच आनंददायी होता. मज्जा आली. इरफानला सिनेमा मनापासून आवडतो आणि अभिनेता म्हणून तो एकदम फोकस्ड असतो. ‘मदारी’ करताना आमच्यात बऱ्याच चर्चा झाल्या, मतभेदही झालेत. पण चांगली गोष्ट म्हणजे,एकत्र येऊन काम केले. एकमेकांवर विश्वास ठेवून काम केले.

Web Title: Working with Irfan came the marrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.